शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 27, 2017 00:26 IST

नांदेड : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़

श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ त्यात ६६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़ अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा मागील चार वर्षांतील दुष्काळामुळे होरपळून निघाला़ त्यातच पेरणी आणि शेतीशी संबंधी उद्योगांसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढू लागल्याने हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली़ दरम्यान, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली होरपळ पाहून विरोधी पक्षांसह शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून धरला़ यातच तत्त्वत: कर्जमाफी आणि आता सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे़ शासनाच्या सरसकट कर्जमाफी, तत्त्वत: आणि प्रोत्साहन अनुदान यामुळे बहुतांश शेतकरी गोंधळून गेले आहेत़ घोषणा होऊन चार दिवस उलटले असले तरी नियम आणि अटी यासंदर्भात बँका अथवा संबंधित यंत्रणेकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही़ जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी कर्जबाजारी आहेत़ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने काढलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील ५० हजार ६५९ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा फायदा होईल़ तर कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या ६६ हजार ८१० शेतकऱ्यांना कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रूपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येणार आहे़ दरम्यान, आपण नियमितपणे कर्ज परतफेड करून घाई केल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे़ गावपातळीवर राष्ट्रीयीकृत बँका असो वा जिल्हा मध्यवर्ती बँका येथील अधिकारी - कर्मचारी आणि गावातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव शेतकऱ्यांना थेट ओळखतात़ बँकांचे कर्जवसुलीचे उद्दिष्ट तसेच सचिवांच्या पगारी यासाठी संबंधितांकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यात येतो़ त्यामुळे बहुतांश शेतकरी उसनवारी करून कर्जाचे हप्ते भरतात़ परत कर्ज घेवून उसने घेतलेल्या पैशाची परतफेड करतात़ बँक अधिकारी, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांचे संबंध बिघडू नये म्हणून शेतकऱ्यांनी केलेला खटाटोप असतो़ परंतु, शासनाने प्रामाणिकपणे नियमित परतफेड करणाऱ्या चालू बाकीदारांना सरसकट कर्जमाफीपासून दूर ठेवल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे़ मराठवाड्यात शेतकरी संपाची सुरूवात अर्धापूर तालुक्यातून झाली होती़ सरसकट कर्जमाफीतून चालू बाकीदारांना न्याय मिळत नसल्याची भावना ठेवून पुन्हा अर्धापूर येथील शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत़