शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
3
हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
5
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
6
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
9
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
10
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
11
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
12
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
13
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
14
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
15
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
16
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
17
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
18
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
19
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
20
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 27, 2017 00:26 IST

नांदेड : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़

श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ त्यात ६६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़ अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा मागील चार वर्षांतील दुष्काळामुळे होरपळून निघाला़ त्यातच पेरणी आणि शेतीशी संबंधी उद्योगांसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढू लागल्याने हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली़ दरम्यान, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली होरपळ पाहून विरोधी पक्षांसह शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून धरला़ यातच तत्त्वत: कर्जमाफी आणि आता सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे़ शासनाच्या सरसकट कर्जमाफी, तत्त्वत: आणि प्रोत्साहन अनुदान यामुळे बहुतांश शेतकरी गोंधळून गेले आहेत़ घोषणा होऊन चार दिवस उलटले असले तरी नियम आणि अटी यासंदर्भात बँका अथवा संबंधित यंत्रणेकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही़ जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी कर्जबाजारी आहेत़ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने काढलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील ५० हजार ६५९ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा फायदा होईल़ तर कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या ६६ हजार ८१० शेतकऱ्यांना कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रूपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येणार आहे़ दरम्यान, आपण नियमितपणे कर्ज परतफेड करून घाई केल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे़ गावपातळीवर राष्ट्रीयीकृत बँका असो वा जिल्हा मध्यवर्ती बँका येथील अधिकारी - कर्मचारी आणि गावातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव शेतकऱ्यांना थेट ओळखतात़ बँकांचे कर्जवसुलीचे उद्दिष्ट तसेच सचिवांच्या पगारी यासाठी संबंधितांकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यात येतो़ त्यामुळे बहुतांश शेतकरी उसनवारी करून कर्जाचे हप्ते भरतात़ परत कर्ज घेवून उसने घेतलेल्या पैशाची परतफेड करतात़ बँक अधिकारी, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांचे संबंध बिघडू नये म्हणून शेतकऱ्यांनी केलेला खटाटोप असतो़ परंतु, शासनाने प्रामाणिकपणे नियमित परतफेड करणाऱ्या चालू बाकीदारांना सरसकट कर्जमाफीपासून दूर ठेवल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे़ मराठवाड्यात शेतकरी संपाची सुरूवात अर्धापूर तालुक्यातून झाली होती़ सरसकट कर्जमाफीतून चालू बाकीदारांना न्याय मिळत नसल्याची भावना ठेवून पुन्हा अर्धापूर येथील शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत़