शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जोगेश्वरी ग्रामपंचायत विभक्तीकरणाचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 19:01 IST

वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे.

वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे.

सरपंच सोनुताई लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, उपसरपंच मंगलबाई निळ, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, अमोल लोहकरे आदींची उपस्थिती होती. ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा कृती आराखडा तयार करुन अंदाजपत्रकास मंजुरी घेणे, प्रधानमंत्री घरकुल योजना, स्वच्छतागृह उभारणे, ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करणे आदी विषयी ठेवण्यात आले.

सभेत नागरिकांनी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कमळापूर-रामराई व नायगाव-बकवालनगर या ठिकाणी नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याची मागणी केली होती. या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जोगेश्वरी, कमळापूर, रामराई, नायगाव, बकवालनगर या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. आजघडीला या पाचही गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जोगेश्वरीपासून नायगाव-बकवालनगर, रामराई, कमळापूर आदी गावांचे अंतर जवळपास ४ किलोमीटर आहे.

त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यास शासनाकडून लोकसंख्येच्या तुलनेत कमी निधी मिळेल तसेच नायगाव-बकवालनगर व कमळापूर हद्दीत मोजकेच कारखाने येत असल्यामुळे कर वसुलीत या गावाचा सर्वांगीण विकास होणार नसल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी हात उंचावून बहुमताने ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी भालेराव यांनी दिली.

या ग्रामसभेत साडे सात कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन विविध विकास कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामसभेला सदस्य सुर्यभान काजळे, माजी सरपंच प्रविण दुबिले, योगेश दळवी, अनिता सरोदे, सुनिल वाघमारे, छाया बोंबले, सुमनबाई काजळे, कलीम शहा, लक्ष्मीबाई कर्डिले, वनिता नरवडे, कल्याण साबळे, पंडीत पनाड, लक्ष्मीबाई चव्हाण, करुणाबाई सोनकांबळे, प्रकाश वाघचौरे, काकासाहेब वाघमारे, माणिकलाल बिलवाल, मिना पनाड, सुभाष कर्डक, अरुण पठारे, नितीन पवार, नानेकर, सुदाम काजळे, सतीश देवकर,अशपाक बेग आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Walujवाळूज