शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

जोगेश्वरी ग्रामपंचायत विभक्तीकरणाचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 19:01 IST

वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे.

वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे.

सरपंच सोनुताई लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, उपसरपंच मंगलबाई निळ, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, अमोल लोहकरे आदींची उपस्थिती होती. ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा कृती आराखडा तयार करुन अंदाजपत्रकास मंजुरी घेणे, प्रधानमंत्री घरकुल योजना, स्वच्छतागृह उभारणे, ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करणे आदी विषयी ठेवण्यात आले.

सभेत नागरिकांनी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कमळापूर-रामराई व नायगाव-बकवालनगर या ठिकाणी नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याची मागणी केली होती. या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जोगेश्वरी, कमळापूर, रामराई, नायगाव, बकवालनगर या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. आजघडीला या पाचही गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जोगेश्वरीपासून नायगाव-बकवालनगर, रामराई, कमळापूर आदी गावांचे अंतर जवळपास ४ किलोमीटर आहे.

त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यास शासनाकडून लोकसंख्येच्या तुलनेत कमी निधी मिळेल तसेच नायगाव-बकवालनगर व कमळापूर हद्दीत मोजकेच कारखाने येत असल्यामुळे कर वसुलीत या गावाचा सर्वांगीण विकास होणार नसल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी हात उंचावून बहुमताने ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी भालेराव यांनी दिली.

या ग्रामसभेत साडे सात कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन विविध विकास कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामसभेला सदस्य सुर्यभान काजळे, माजी सरपंच प्रविण दुबिले, योगेश दळवी, अनिता सरोदे, सुनिल वाघमारे, छाया बोंबले, सुमनबाई काजळे, कलीम शहा, लक्ष्मीबाई कर्डिले, वनिता नरवडे, कल्याण साबळे, पंडीत पनाड, लक्ष्मीबाई चव्हाण, करुणाबाई सोनकांबळे, प्रकाश वाघचौरे, काकासाहेब वाघमारे, माणिकलाल बिलवाल, मिना पनाड, सुभाष कर्डक, अरुण पठारे, नितीन पवार, नानेकर, सुदाम काजळे, सतीश देवकर,अशपाक बेग आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Walujवाळूज