शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘जेट’च्या सकाळच्या विमानाचे उड्डाण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:31 IST

६ एप्रिलपासून नवे वेळापत्रक

औरंगाबाद : जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानाचे ३१ मार्चपासून पुन्हा उड्डाण सुरू होणार होते; परंतु या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडले असून, आता ६ एप्रिलपासून हे विमान सुरू होईल, अशी माहिती जेट एअरवेज आणि चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई या दोन्ही विमानांचे उड्डाण सध्या बंद आहे. जेट एअरवेजने प्रारंभी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी येणारे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानही रद्द के ले. हे विमान पुन्हा कधी उड्डाण घेणार, याविषयी अनिश्चितता व्यक्त होत होती; परंतु अखेर सकाळच्या विमानाचे ३१ मार्चपासून उड्डाणाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

चिकलठाणा विमानतळावरून फक्त ट्रू जेट आणि एअर इंडियाच्या विमानांचे उड्डाण सुरू आहे. जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्याने औरंगाबादहून मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. त्यामुळे मुंबईचा हवाई प्रवास महागल्याचा अनुभवही प्रवाशांना येत आहे. जेट एअरवेजचे सकाळचे विमान आता ३१ मार्चऐवजी ६ एप्रिलपासून उड्डाण घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही दिवस या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

५ एप्रिलपर्यंत रद्द जेट एअरवेजचे सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ५ एप्रिलपर्यंत रद्द राहणार आहे, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली, तर आॅपरेशनल कारणांमुळे सकाळच्या विमानाचे ३१ मार्चऐवजी आता ६ एप्रिलपासून उड्डाण सुरू होईल.बुकिंग केलेल्या प्रवाशांना रिफंड देण्यात येत आहे. सायंकाळच्या विमानाच्या उड्डाणाविषयी काही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन