शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

‘जेट’च्या सकाळच्या विमानाचे उड्डाण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:31 IST

६ एप्रिलपासून नवे वेळापत्रक

औरंगाबाद : जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानाचे ३१ मार्चपासून पुन्हा उड्डाण सुरू होणार होते; परंतु या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडले असून, आता ६ एप्रिलपासून हे विमान सुरू होईल, अशी माहिती जेट एअरवेज आणि चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई या दोन्ही विमानांचे उड्डाण सध्या बंद आहे. जेट एअरवेजने प्रारंभी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी येणारे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानही रद्द के ले. हे विमान पुन्हा कधी उड्डाण घेणार, याविषयी अनिश्चितता व्यक्त होत होती; परंतु अखेर सकाळच्या विमानाचे ३१ मार्चपासून उड्डाणाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

चिकलठाणा विमानतळावरून फक्त ट्रू जेट आणि एअर इंडियाच्या विमानांचे उड्डाण सुरू आहे. जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्याने औरंगाबादहून मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. त्यामुळे मुंबईचा हवाई प्रवास महागल्याचा अनुभवही प्रवाशांना येत आहे. जेट एअरवेजचे सकाळचे विमान आता ३१ मार्चऐवजी ६ एप्रिलपासून उड्डाण घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही दिवस या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

५ एप्रिलपर्यंत रद्द जेट एअरवेजचे सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ५ एप्रिलपर्यंत रद्द राहणार आहे, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली, तर आॅपरेशनल कारणांमुळे सकाळच्या विमानाचे ३१ मार्चऐवजी आता ६ एप्रिलपासून उड्डाण सुरू होईल.बुकिंग केलेल्या प्रवाशांना रिफंड देण्यात येत आहे. सायंकाळच्या विमानाच्या उड्डाणाविषयी काही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन