शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

जेट एअरवेजचे उन्हाळ्यात औरंगाबादहून पुन्हा ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 14:34 IST

तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

औरंगाबाद : जेट एअरवेजची औरंगाबादहून मार्च, एप्रिलअखेर पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोनाची तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजची विमानसेवा तीन वर्षांपूर्वी बंद पडली होती. परिणामी, औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीला मोठा फटका बसला. पर्यटन, उद्योग क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला; परंतु त्यानंतर काही दिवसांत औरंगाबादहून इंडिगोची विमानसेवा सुरू झाली. कोरोनाच्या विळख्याने औरंगाबादच्या विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्यात विमानसेवा वाढीकडे आता पुन्हा सर्वांचे लक्ष लागले आहे. जेट एअरवेजने पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे; परंतु कोरोनामुळे ही सेवा सुरू होणे काहीसे लांबणीवर पडले. मात्र, आता समर शेड्युल म्हणजे उन्हाळ्यात जेट एअरवेज पुन्हा एकदा औरंगाबादहून सुरू होईल, असे संकेत आहेत. कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरू होणार आणि त्याचे वेळापत्रक आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुन्हा सुरू होणारजेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे; परंतु कधीपासून सुरू होणार, हे अजून स्पष्ट नाही. कोरोना प्रादुर्भावामुळे ही विमानसेवा सुरू होणे लांबले आहे- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

समर शेड्युलमध्ये नियोजनऔरंगाबादहून जेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होईल, यात शंका नाही. समर शेड्युलमध्ये विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन होऊ शकते.- अहेमद जलील, एरिया मॅनेजर, जेट एअरवेज

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन