शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

‘जयलक्ष्मी’च्या जमिनीसाठी बोली लागलीच नाही !

By admin | Updated: March 23, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील श्री जयलक्ष्मी शुगर या कारखान्याकडून अनेक ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई केली होती.

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील श्री जयलक्ष्मी शुगर या कारखान्याकडून अनेक ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जमीन जप्त करून मंगळवारी संबंधित स्पॉटवर लिलाव ठेवला होता. परंतु, बोली लावण्यासाठी कोणीच फिरकले नाही. त्यामुळे आता फेरलिलाव काढण्यात येणार आहे.उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथे श्री जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्ट प्रा. लि. हा कारखाना आहे. या कारखान्यासाठी तुळजापूर, उस्मानाबादसह औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस घातला होता. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनासह साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई करून अंमलबजावणीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून संबंधित कारखान्याला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या. परंतु, शेतकऱ्यांचे ७ कोटी ६९ लाख रूपये दिले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमिनी जप्तीचे आदेश काढले होते. त्यानुसार २० आॅगस्ट २०१५ रोजी उपरोक्त रक्कमेच्या वसुलीसाठी जवळपास वेगवेगळ्या बारा गटांतील मिळून शंभर एकराच्या आसपास क्षेत्र जप्त करून शासन नावे जमा केले. दरम्यान, जप्तीची प्रक्रिया झाल्यानंतर लागलीच प्रशासनाकडून लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार जनजागृतीही करून २२ मार्च रोजी संबंधित स्पॉटवर लिलाव ठेवला होता. परंतु, बोली बोलण्यासाठी कोणीही आले नाही. त्यामुळे संबंधित शंभर एकरावर क्षेत्राचा लिलाव होवू शकला नाही. त्यामुळे लवकरच फेरलिलाव काढला जाणार आहे. लिलावासाठी उस्मानाबाद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश जाधव, मंडळ अधिकारी चौरे, फुलचंद बेरड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)