शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

१५ नोव्हेंबरपासून मिळणार ‘जायकवाडी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़ जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़पाथरी उपविभागात बोरगाव, पाथरी, गुंज, बाभळगाव-४, बाभळगाव-५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत़ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०१० साली पाणी सोडण्यात आले होते़ त्यानंतर पूर्ण क्षमतेने जायकवाडी धरण न भरल्यामुळे या भागातील सिंचनही खंडीत झाले होते़ सात वर्षानंतर जायकवाडी धरण पहिल्यांदाच १०० टक्के भरले आहे़ यामुळे या भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ जायकवाडी धरण पाण्याच्या आवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली़ यामध्ये जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला़ कालवा समितीच्या निर्णयानंतर पाणी सोडण्यासाठीचे जाहीर प्रगटन काढले जाणार आहे़यावर्षी गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरले आहेत़ त्याचबरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकºयांनी पिकांचे नियोजन सुरू केले आहे़रबी हंगामातील गहू, ज्वारी आणि खरीप हंगामातील कापूस, तूर याबरोबरच उसासाठीही नियोजन सुरू आहे़ पाथरी उपविभागात १० हजार हेक्टर क्षेत्र पाणी पाळी सिंचनाखाली येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़