शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

१५ नोव्हेंबरपासून मिळणार ‘जायकवाडी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़ जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़पाथरी उपविभागात बोरगाव, पाथरी, गुंज, बाभळगाव-४, बाभळगाव-५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत़ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०१० साली पाणी सोडण्यात आले होते़ त्यानंतर पूर्ण क्षमतेने जायकवाडी धरण न भरल्यामुळे या भागातील सिंचनही खंडीत झाले होते़ सात वर्षानंतर जायकवाडी धरण पहिल्यांदाच १०० टक्के भरले आहे़ यामुळे या भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ जायकवाडी धरण पाण्याच्या आवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली़ यामध्ये जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला़ कालवा समितीच्या निर्णयानंतर पाणी सोडण्यासाठीचे जाहीर प्रगटन काढले जाणार आहे़यावर्षी गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरले आहेत़ त्याचबरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकºयांनी पिकांचे नियोजन सुरू केले आहे़रबी हंगामातील गहू, ज्वारी आणि खरीप हंगामातील कापूस, तूर याबरोबरच उसासाठीही नियोजन सुरू आहे़ पाथरी उपविभागात १० हजार हेक्टर क्षेत्र पाणी पाळी सिंचनाखाली येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़