शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
5
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
6
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
7
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
8
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
9
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
10
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
11
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
12
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
17
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
19
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण ८५ टक्के भरल्यावर उघडणार दरवाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:34 IST

जायकवाडी धरणाचा जलसाठा ८०% झाला असून उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीत आवक सुरू आहे.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णयजायकवाडी धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई होणार नाही

पैठण : धरणाचा जलसाठा ८५ % झाल्यानंतर धरणात येणारी आवक लक्षात घेऊनच जायकवाडी धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे अशा सूचना उपविभागिय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठकीत बोलताना दिल्या.

जायकवाडी धरणाचा जलसाठा ८०% झाला असून उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीत आवक सुरू आहे. अशा परिस्थितीत जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास  निर्माण होणाऱ्या संभाव्य पुर परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजना करण्या संदर्भात सोमवारी प्रशासकीय यंत्रणेची उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी विजय लोंढे, धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, बंडू आंधारे, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, कृषी अधिकारी सोनवणे आदी शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

जायकवाडी प्रशासनाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाखालील पाच किलोमीटर पर्यंतचा पूर नकाशा व धरणातून एक ते आडिच लाख क्युसेक्स पर्यंत विसर्ग केल्यास पुराने बाधीत होणाऱ्या पैठण शहरातील क्षेत्र याचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी बैठकीत केले. दरम्यान धरणाखालील चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढून ठेवण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

महत्त्वाचे अधिकारी गैरहजर..पुरपरिस्थितीत महत्वाची भूमिका असलेले आरोग्य खाते, महावितरण, परिवहन, दूरसंचार, पाचोड व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी महत्त्वाचे अधिकारी आजच्या बैठकीला हजर नव्हते.

विद्युत रोषणाई होणार नाही जायकवाडी धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई करू नका असे स्पष्ट आदेश आज उपविभागीय अधिकारी पैठण यांनी जायकवाडी प्रशासनास दिले आहेत. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई करण्यास परवानगी नाकारली असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले. सांडव्यावरील विद्युत रोषणाईचा जायकवाडी धरणाचा पँटर्न देशभरात राबविण्यात येत असून यंदा मात्र जायकवाडी धरणावरच  विद्युत रोषणाईस मनाई करण्यात आल्याने पैठण करांचा मोठा हिरमोड झाला आहे.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय- पैठण शहर व गोदाकाठच्या १४ गवात पूर रेषा रेखाटने. - पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बोट व लाईफ जँकेट उपलब्ध ठेवणे. - बँकवाटरचे पाणी लगतच्या गावात शिरू नये म्हणून उपाय योजना करणे.- संदेश वहन यंत्रणा सज्ज ठेवणे.- पोहणाऱ्यांचे पथक  तैनात करणे. - स्वयंसेवी समाजसेवी संस्थांची मदत घेणे.- जेसीबी, पोकलेन, हायवा ट्रक व दळणवळण यंत्रणा उपलब्ध ठेवणे.- स्थलांतर करण्यासाठी एसटी बसेस कार्यान्वित करणे.- पूर बाधीतांची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मठ, धर्मशाळा, मंदिरे आदी राखीव ठेवणे. - मुबलक धान्यसाठ्याची तरतूद करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण