शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 12:00 IST

जलसाठा असताना प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की, दररोज १२ मेगावॉट विजेची तूट

पैठण : गेल्या वर्षभरापासून जायकवाडी धरणावरील (Jayakwadi Dam) जलविद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असल्याने विद्युत निर्मिती बंद आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असताना वर्षभर प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की महापारेषण कंपनीवर ओढवली आहे. चाळीस वर्षांपूर्वी जपानी बनावटीच्या मशिनरीमध्ये दुरुस्ती सुरू असताना अनेक पार्ट निकामी झाल्याचे समोर येत आहे. या मशिनरीचे तंत्रज्ञही लवकर उपलब्ध होत नसल्याने हा जलविद्युत प्रकल्प कधी चालू होईल, याबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे.

डिसेंबर २०१९ पासून जलविद्युत प्रकल्पाला ग्रहण लागले. १०० फूट खोलीवर असलेल्या जलविद्युत प्रकल्पातील टर्बाईनच्या सपोर्ट बेरिंग निकामी झाल्याने प्रकल्प बंद पडला. त्यातच टर्बाईनचे रनर नादुरुस्त झाले. सध्या हे रनर काढायचे काम सुरू असून, यानंतर आणखी काय खराब झाले हे समोर येईल, असे उपकार्यकारी अभियंता उमेश सोनी यांनी सांगितले. दरम्यान, दुरुस्ती लवकरच होईल; मात्र किती दिवसात होईल, याबाबत त्यांनी निश्चित कालावधी सांगितला नाही. जलविद्युत प्रकल्प बंद आहे. यामुळे दररोज १२ मेगावॉट विजेची तूट राज्य विद्युत वितरण प्रणालीला सोसावी लागत आहे. प्रकल्पातून वीजनिर्मितीचे काम सन १९८४-८५ पासून सुरू आहे. जलविद्युत केंद्रातून निर्माण झालेली वीज राज्य विद्युत वितरण प्रणालीला पुरविण्यात येऊन आत्यंतिक गरजेच्या वेळेस राज्याच्या वीजपुरवठ्यात भर घालण्यात येते. दररोज सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ अशी सर्वसाधारण या केंद्रातून विद्युत निर्मिती केली जाते. यासाठी १.१ दलघमी पाण्याचा वापर केला जातो. मात्र देखभाल व नियोजनाचा अभाव असल्याने हा प्रकल्प दोन वर्षांपासून बंद पडलेला आहे.

रिव्हर्सिबल टर्बाइनचे एकमेव वीजनिर्मिती केंद्रजपानी बनावटीची रिव्हर्सिबल टर्बाइन जायकवाडी येथील विद्युतनिर्मिती प्रकल्पाचे अनोखे वैशिष्ट्य असूूून, भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच वीजनिर्मिती केंद्र आहे. रिव्हर्सिबल टर्बाइनमुळे धरणातील पाण्याचा उपयोग करून दिवसा वीज निर्मिती करता येते. तर याच रिव्हर्सिबल टर्बाइनला रात्रीच्यावेळेस पंप म्हणून कार्यान्वित करून धरणातून नदीत सोडलेले पाणी पुन्हा धरणात आणता येते. दिवसभरात सकाळी व संध्याकाळी विजेच्या अधिक गरजेच्यावेळी नाथसागरातील पाण्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यात येते.

सांडव्याची भिंत व पिचिंग ढासळलीसामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे व पैठण तहसीलदार यांना महापारेषणने दिलेल्या लेखी पत्रात पाटबंधारे खात्याने धरणातून विसर्ग केल्याने जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत व पिचिंग ढासळले असून, हे काम पूर्ण झाल्याशिवाय जलविद्युत प्रकल्प चालू करता येणार नाही असे म्हटले आहे. यामुळे जलविद्युत प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्प कधी सुरू होईल, यावर ठाम नसल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद