शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 12:00 IST

जलसाठा असताना प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की, दररोज १२ मेगावॉट विजेची तूट

पैठण : गेल्या वर्षभरापासून जायकवाडी धरणावरील (Jayakwadi Dam) जलविद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असल्याने विद्युत निर्मिती बंद आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असताना वर्षभर प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की महापारेषण कंपनीवर ओढवली आहे. चाळीस वर्षांपूर्वी जपानी बनावटीच्या मशिनरीमध्ये दुरुस्ती सुरू असताना अनेक पार्ट निकामी झाल्याचे समोर येत आहे. या मशिनरीचे तंत्रज्ञही लवकर उपलब्ध होत नसल्याने हा जलविद्युत प्रकल्प कधी चालू होईल, याबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे.

डिसेंबर २०१९ पासून जलविद्युत प्रकल्पाला ग्रहण लागले. १०० फूट खोलीवर असलेल्या जलविद्युत प्रकल्पातील टर्बाईनच्या सपोर्ट बेरिंग निकामी झाल्याने प्रकल्प बंद पडला. त्यातच टर्बाईनचे रनर नादुरुस्त झाले. सध्या हे रनर काढायचे काम सुरू असून, यानंतर आणखी काय खराब झाले हे समोर येईल, असे उपकार्यकारी अभियंता उमेश सोनी यांनी सांगितले. दरम्यान, दुरुस्ती लवकरच होईल; मात्र किती दिवसात होईल, याबाबत त्यांनी निश्चित कालावधी सांगितला नाही. जलविद्युत प्रकल्प बंद आहे. यामुळे दररोज १२ मेगावॉट विजेची तूट राज्य विद्युत वितरण प्रणालीला सोसावी लागत आहे. प्रकल्पातून वीजनिर्मितीचे काम सन १९८४-८५ पासून सुरू आहे. जलविद्युत केंद्रातून निर्माण झालेली वीज राज्य विद्युत वितरण प्रणालीला पुरविण्यात येऊन आत्यंतिक गरजेच्या वेळेस राज्याच्या वीजपुरवठ्यात भर घालण्यात येते. दररोज सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ अशी सर्वसाधारण या केंद्रातून विद्युत निर्मिती केली जाते. यासाठी १.१ दलघमी पाण्याचा वापर केला जातो. मात्र देखभाल व नियोजनाचा अभाव असल्याने हा प्रकल्प दोन वर्षांपासून बंद पडलेला आहे.

रिव्हर्सिबल टर्बाइनचे एकमेव वीजनिर्मिती केंद्रजपानी बनावटीची रिव्हर्सिबल टर्बाइन जायकवाडी येथील विद्युतनिर्मिती प्रकल्पाचे अनोखे वैशिष्ट्य असूूून, भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच वीजनिर्मिती केंद्र आहे. रिव्हर्सिबल टर्बाइनमुळे धरणातील पाण्याचा उपयोग करून दिवसा वीज निर्मिती करता येते. तर याच रिव्हर्सिबल टर्बाइनला रात्रीच्यावेळेस पंप म्हणून कार्यान्वित करून धरणातून नदीत सोडलेले पाणी पुन्हा धरणात आणता येते. दिवसभरात सकाळी व संध्याकाळी विजेच्या अधिक गरजेच्यावेळी नाथसागरातील पाण्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यात येते.

सांडव्याची भिंत व पिचिंग ढासळलीसामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे व पैठण तहसीलदार यांना महापारेषणने दिलेल्या लेखी पत्रात पाटबंधारे खात्याने धरणातून विसर्ग केल्याने जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत व पिचिंग ढासळले असून, हे काम पूर्ण झाल्याशिवाय जलविद्युत प्रकल्प चालू करता येणार नाही असे म्हटले आहे. यामुळे जलविद्युत प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्प कधी सुरू होईल, यावर ठाम नसल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद