शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

जाट, पटेलांसारखे रस्त्यावर उतरा

By admin | Updated: May 15, 2016 00:04 IST

औरंगाबाद : राज्यातील सध्याचे सरकार हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे. ते मराठ्यांना कधीही स्वत:हून आरक्षण देणार नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे हेही मूर्खपणाचे आहे.

औरंगाबाद : राज्यातील सध्याचे सरकार हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे. ते मराठ्यांना कधीही स्वत:हून आरक्षण देणार नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे हेही मूर्खपणाचे आहे. आपल्याला आरक्षण हवे असेल तर ते गुजरातेतील पटेल आणि हरियाणातील जाटांप्रमाणे रस्त्यावर उतरूनच मिळवावे लागेल, त्यासाठी सर्वस्व त्यागण्याची तयारी ठेवा, असे आवाहन आ. नितेश राणे यांनी येथे मराठा समाजातील तरुणांना केले. राज्याचे उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे हे ड्युप्लिकेट मराठा आहेत, त्यांची डीएनए तपासणी करायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी तावडे यांच्यावरही टीका केली. छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचच्या वतीने शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा आरक्षण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितेश राणे बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नामदेवराव पवार, प्रदीप सोळुंके, माजी महापौर सुदाम सोनवणे, अभिजित देशमुख, संदीप बोरसे, सरोज पाटील, अमोल रंधे, अक्षय सोळुंके, नीलेश भोसले, अक्षय काथार आदींची उपस्थिती होती. यावेळी राणे यांनी भाजप, शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यातील भाजप सरकारने मराठ्यांना मिळालेले आरक्षण काढून घेतले. इतर कोणत्याही जातीबाबत हे सरकार अशी हिंमत करू शकले नसते. पण मराठ्यांच्या बाबतीत त्यांनी केली. दुर्दैवाने दोन वर्ष उलटली तरी हे आरक्षण बहाल करण्याविषयी कोणीही बोलत नाही. विधिमंडळात आज मराठा समाजाचे एकूण १४५ आमदार आहेत, पण तेही गप्प आहेत. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. एवढी मोठी संख्या असूनही सर्व जण आज शेपूट घालून बसलेत. त्यांना कशाचाही राग येत नाही. हे तीन टक्क्यांचे सरकार सतत मराठा समाजाला डिवचण्याचे काम करीत आहे. आधी जिजाऊंविषयी चिखलफेक करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण दिले. या राज्यात एकीकडे खोटे शिवचरित्र सांगणाऱ्यांना महाराष्ट्रभूषण मिळतो आणि दुसरीकडे खरे शिवचरित्र ज्यांनी मांडले त्या पानसरेंची हत्या होते. हे कशाचे द्योतक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल असे समजणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.मेटे नव्हे चाटेनितेश राणे यांनी यावेळी विनायक मेटे आणि विनोद तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारने मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदी विनोद तावडे यांची निवड केली आहे. परंतु दोन वर्षे झाली या तावडेंनी समितीची एकही बैठक घेतलेली नाही. त्यांच्या जोडीला बीडचे मेटेही आहेत. मेटे कसले त्यांचे नाव तर चाटे ठेवले पाहिजे, कारण त्याशिवाय ते दुसरे काहीच करीत नाहीत, असेही राणे म्हणाले.