शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ

By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST

लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़

 लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़ त्यामुळे जार वॉटरची विक्री जोमातच आहे़ ‘लोकमत’ने आरोग्याशी हानीकारक असणार्‍या या पाण्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले़ मात्र अन्न व औषधी प्रशासनाचा वेळकाढूपणा जार वॉटर विक्रीला पोषक ठरत आहे़ लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे जार वॉटरची विक्री करणारे जवळपास ३६ ते ४२ प्लांटधारक आहेत़ त्यांच्याकडे ना अन्न व औषधी विभागाचा परवाना ना स्थानिक संस्थेचा़ बीएसआय मानांकन तर दूरच़ शिवाय, पाण्याची कसलीही चाचणी न करता, शुद्धीकरण न करता, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ची मालिका सुरू झाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले होते़ मात्र जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पाण्याची कसलीही चाचणी न करता विक्री होत असेल आणि त्यांच्याकडे परवाना नसेल तर हा व्यवसाय अनाधिकृत व धोकादायक असल्याचे सांगून कारवाई करण्याचे लेखी आदेश अन्न व औषधी प्रशासनाला दिले होते़ त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने उदगीर शहरात ७ व लातूर शहरातील २ प्लांटधारकांची तपासणी केली़ या तपासणीनंतर कसलीही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाने केली नाही़ अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात विचारले असता ते कधी औरंगाबादला कार्यशाळा तर कधी मुंबईला मिटींग असल्याचे सांगून वेळकाढूचे धोरण अवलंबत आहेत़ अन्न व औषधी निरिक्षक कारवाई चालू असल्याचे सांगत आहेत़ नेमके कारवाईचे गोडबंगाल अन्न व औषधी प्रशासनाकडून समजत नाहीत़ त्यामुळे आजही लातूर शहर व जिल्ह्यात जारद्वारे पाण्याची खुलेआम विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ने या विषयावर प्रबोधन केल्यामुळे जनतेमध्ये जनजागृती झाली आहे़ त्यामुळे जार पाण्याची विक्री थंडावली आहे़ परंतु, प्लांटधारकाचा हा व्यवसाय सुरूच आहे़ केवळ अन्न व औषधी प्रशासनाचे या व्यवसाय धारकांना अभय मिळत असल्याने हा प्रकार चालू आहे़ (प्रतिनिधी) प्रशासन गप्प पाण्याचे शुद्धीकरण करून पॅकबंद पाण्याची विक्री करण्यासाठी किमान २२ चाचण्या घ्याव्या लागतात़ सुक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या पदवीधारक त्या प्लांटमध्ये केमिस्ट म्हणून कार्यरत असायला हवेत़ जलशुद्धीकरण केल्यानंतर पॅकबंद पाणी करून विक्री करण्यास कोणाचीही हरकत नाही़ परंतु, शुद्धीकरणही नाही आणि चाचण्याही नाहीत़