शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

‘जनसुविधे’ची योजना बासनात

By admin | Updated: March 30, 2017 23:39 IST

बीडप्रशासकीय दिरंगाई व पदाधिकाऱ्यांच्या वादात शासकीय योजना कशा रखडतात? याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘जनसुविधा’ ही स्मशानभूमी बांधकामाची योजना!

संजय तिपाले बीडप्रशासकीय दिरंगाई व पदाधिकाऱ्यांच्या वादात शासकीय योजना कशा रखडतात? याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘जनसुविधा’ ही स्मशानभूमी बांधकामाची योजना! जिल्हा परिषदेने या योजनेसाठी निश्चित केलेल्या गावांना नियोजन समितीने परवानगी न दिल्याने मागील दोन वर्षांपासून ४ कोटी रुपयांतील एक रुपयाही खर्च होऊ शकला नाही. ३१ मार्च उजाडला तरीही भिजत घोंगडे राहिल्याने आता निधीसाठी मुदतवाढ घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. खेडेगावांमध्ये स्मशानभूमी, कब्रस्तान बांधकाम, संरक्षक भिंत व सोयीसुविधांसाठी जनसुविधा या विशेष योजनेमार्फत निधी पुरविला जातो. जिल्हा परिषदेने सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन समितीकडून मान्यता घेऊन ग्रामीण यंत्रणेमार्फत ही योजना राबवायची आहे. २०१५-१६ मध्ये जिल्हा नियोजन समितीने जनसुविधा योजनांतर्गत ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. २०१५ मध्ये जिल्हा परिषदेने ४९५ गावांची यादी तयार करुन जिल्हा नियोजन समितीकडे मान्यतेसाठी पाठविली. मात्र तेंव्हा जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. नियोजन समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी या योजनेसाठी निवडलेली गावे राष्ट्रवादीच्या मर्जीतील असल्याचा आरोप केला. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ही यादी रद्द करुन नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संसद आदर्श, आमदार आदर्श योजनेसाठी निवडलेल्या गावांचा समावेश करुन नव्याने यादी तयार करण्यात आली. ३ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पुन्हा एकदा पार पडली. मात्र त्यात या योजनेच्या २०१५ मधील निधी खर्चाला परवानगी मिळालीच नाही. २०१६ मधील ३९ गावांतील कामांना हिरवा कंदील मिळाला. दरम्यान, २०१५ मध्ये निधी उपलब्ध झालेले ३ कोटी ८३ लाख अखर्चितच राहिले. आता मुदत संपल्याने हा निधी परत मागविण्यासाठी खटाटोप करावा लागणार आहे.