शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जालना रोड सहा पदरी करणार; ७५ कोटींची निविदा निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:55 IST

जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. रोड सहा पदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबीड बायपासचे रुंदीकरण होणे अशक्य: कंत्राटदार अंतिम होताच काम सुरू होणे शक्य

औरंगाबाद : जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. रोड सहा पदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अखत्यारीत येत नाही. त्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे. जालना रोडचे काम ७५ कोटीदरम्यान होणार आहे. जालना रोडचे रुंदीकरण होणार नाही. तसेच त्यावर बीटी सरफेसचे काम एनएचएआय करणार नाही. पेव्हर ब्लॉकसह एकेक पदर दोन्ही बाजूंनी वाढविण्यात येईल. रोडची लेव्हल एकच असेल, सहा पदरी रोड होईल. नगरनाका ते चिकलठाणापर्यंत रोडचे काम करण्यात येईल. दोन्ही बाजूंनी साडेतीन मीटरचा एक पदर वाढविण्यात येईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला.जालना रोडच्या कामाचा प्रवास असाडिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालना रोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आता जानेवारीत ७५ कोटीतूनच काम करण्याच्या सूचना केल्या गेल्या. फेबु्रवारी-मार्च महिन्यांत या कामासाठी निविदा काढण्यात आल्या.जालना रोडसाठी आजवरच्या घोषणाडिसेंबर २०१५ ४०० कोटीजून २०१८ २४५ कोटीडिसेंबर २०१८ १०४ कोटीजानेवारी २०१९ ७५ कोटीरोडवर करण्यात आले मार्किंगजालना रोडच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाने मार्किंग करण्यात आले आहे. सदरील मार्किंग सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय केंद्र व राज्य शासनाच्या विभागाने केलेले नाही. तिन्ही विभागांनी या मार्किंगशी संबंध नसल्याचे सांगितले. एनएचएआय सूत्रांनी सांगितले, जालना रोडच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत; परंतु त्या अनुषंगाने कोणतेही मार्किंग रोडवर एनएचएआयने केलेले नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा