शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

जालना रोड, बीड बायपास एनएचएआयच्या अखत्यारीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:59 IST

जालना रोड, बीड बायपास या रोडचे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरण करून घेतले तरी ते दोन्ही रोड आपल्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिले आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोड, बीड बायपास या रोडचे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरण करून घेतले तरी ते दोन्ही रोड आपल्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिले आहे. जर रस्ते अखत्यारीत येत नव्हते तर डीपीआर, रुंदीकरणात येणा-या मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी कशाच्या आधारे केली हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.जालना रोडवर २०१४-१५ या वर्षात करण्यात आलेल्या सव्वादोन कोटींच्या खर्चानंतर काहीही खर्च झालेला नाही. त्यामुळे रोड पूर्णत: खड्ड्यात गेलेला आहे. तशीच अवस्था बीड बायपासची आहे. एनएचएआय जालना रोडचे काम करणार म्हणून महापालिकेनेदेखील क्रांतीचौक ते महावीर चौक या सव्वासहा कोटींच्या निविदा २०१५ साली मंजूर होऊनही काम करून घेतलेले नाही. परिणामी मनपा, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआय या त्रिकुटांमध्ये अडकलेले हे दोन्ही महत्त्वाचेरस्ते अधांतरी असून,सामान्य औरंगाबादकरांसोबतलपंडाव सुरू आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ सूत्रांनी रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले.केंद्राच्या परवानगीनंतर निविदाप्रकल्प संचालक गाडेकर यांनी कळविले आहे की, शहरातील प्रस्तावित नगरनाका ते केम्ब्रिज स्कूल, बीड बायपास या रस्त्यांकरिता एनएचएआयचा प्रस्ताव ३१ मार्च २०१७ रोजी पाठविला आहे. हे दोन्ही रस्ते कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळे त्या रस्त्यांची डागडुजी एनएचएआयकडे येत नाही. एनएचडीपीत त्या रस्त्यांचा समावेश नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाची पूर्व परवानगी आवश्यक आहे.एनएचएआयच्या मुख्यालयातून परवानगी आल्यानंतर निविदा प्रक्रियेचे काम करण्यात येईल. अद्याप हे प्रकल्प रद्द करण्यात आलेलेनाहीत.या लपंडावामुळे असा बसला फटकाएनएचएआयने जालना रोड व बीड बायपासचे काम करण्याबाबतची घोषणा २०१५ मध्ये केली. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. ही घोषणा होताच पीडब्ल्यूडी आणि मनपाने रस्त्यावर खर्च करणे बंद करून टाकले. एनएचएआय काम करणार म्हणून मनपाने क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्यासाठी आलेला निधी आजपर्यंत तसाच पडून ठेवला.मनपाने त्या रस्त्याकडे २०१५ पासून आजपर्यंत दुर्लक्ष केले. परंतु एनएचएआयकडे जालना रोड आणि बीड बायपासचे काम केव्हा सुरू करणार याबाबत विचारणा केली नाही. बीड बायपासची तीच अवस्था झाली आहे. देवळाईपर्यंत रस्ता मनपा हद्दीत आहे. मनपा महानुभाव आश्रम ते देवळाई चौकापर्यंतच्या रस्त्याबाबत काहीही नियोजन करीत नाही.हे दोन्ही रस्ते अलीकडच्या काळातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघाती होत आहेत. सामान्य नागरिकांच्या जिवावर हा सगळा प्रकार बेतत आहे. कागदी घोडे नाचविण्यात मग्न असलेल्या मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआयमुळे सामान्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.