शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

जालना रोड, बीड बायपास एनएचएआयच्या अखत्यारीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:59 IST

जालना रोड, बीड बायपास या रोडचे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरण करून घेतले तरी ते दोन्ही रोड आपल्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिले आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोड, बीड बायपास या रोडचे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरण करून घेतले तरी ते दोन्ही रोड आपल्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिले आहे. जर रस्ते अखत्यारीत येत नव्हते तर डीपीआर, रुंदीकरणात येणा-या मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी कशाच्या आधारे केली हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.जालना रोडवर २०१४-१५ या वर्षात करण्यात आलेल्या सव्वादोन कोटींच्या खर्चानंतर काहीही खर्च झालेला नाही. त्यामुळे रोड पूर्णत: खड्ड्यात गेलेला आहे. तशीच अवस्था बीड बायपासची आहे. एनएचएआय जालना रोडचे काम करणार म्हणून महापालिकेनेदेखील क्रांतीचौक ते महावीर चौक या सव्वासहा कोटींच्या निविदा २०१५ साली मंजूर होऊनही काम करून घेतलेले नाही. परिणामी मनपा, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआय या त्रिकुटांमध्ये अडकलेले हे दोन्ही महत्त्वाचेरस्ते अधांतरी असून,सामान्य औरंगाबादकरांसोबतलपंडाव सुरू आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ सूत्रांनी रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले.केंद्राच्या परवानगीनंतर निविदाप्रकल्प संचालक गाडेकर यांनी कळविले आहे की, शहरातील प्रस्तावित नगरनाका ते केम्ब्रिज स्कूल, बीड बायपास या रस्त्यांकरिता एनएचएआयचा प्रस्ताव ३१ मार्च २०१७ रोजी पाठविला आहे. हे दोन्ही रस्ते कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळे त्या रस्त्यांची डागडुजी एनएचएआयकडे येत नाही. एनएचडीपीत त्या रस्त्यांचा समावेश नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाची पूर्व परवानगी आवश्यक आहे.एनएचएआयच्या मुख्यालयातून परवानगी आल्यानंतर निविदा प्रक्रियेचे काम करण्यात येईल. अद्याप हे प्रकल्प रद्द करण्यात आलेलेनाहीत.या लपंडावामुळे असा बसला फटकाएनएचएआयने जालना रोड व बीड बायपासचे काम करण्याबाबतची घोषणा २०१५ मध्ये केली. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. ही घोषणा होताच पीडब्ल्यूडी आणि मनपाने रस्त्यावर खर्च करणे बंद करून टाकले. एनएचएआय काम करणार म्हणून मनपाने क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्यासाठी आलेला निधी आजपर्यंत तसाच पडून ठेवला.मनपाने त्या रस्त्याकडे २०१५ पासून आजपर्यंत दुर्लक्ष केले. परंतु एनएचएआयकडे जालना रोड आणि बीड बायपासचे काम केव्हा सुरू करणार याबाबत विचारणा केली नाही. बीड बायपासची तीच अवस्था झाली आहे. देवळाईपर्यंत रस्ता मनपा हद्दीत आहे. मनपा महानुभाव आश्रम ते देवळाई चौकापर्यंतच्या रस्त्याबाबत काहीही नियोजन करीत नाही.हे दोन्ही रस्ते अलीकडच्या काळातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघाती होत आहेत. सामान्य नागरिकांच्या जिवावर हा सगळा प्रकार बेतत आहे. कागदी घोडे नाचविण्यात मग्न असलेल्या मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआयमुळे सामान्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.