शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

जालना बाजारपेठेतील आवक मंदावली

By admin | Updated: June 17, 2016 00:28 IST

गजेंद्र देशमुख , जालना मराठवाड्यात भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना मोंढ्यात दुष्काळी स्थितीच दाहकता वाढत आहे. पावसाने ओढ दिल्याने मोंढ्यात आवक मंदावली आहे.

गजेंद्र देशमुख , जालनामराठवाड्यात भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना मोंढ्यात दुष्काळी स्थितीच दाहकता वाढत आहे. पावसाने ओढ दिल्याने मोंढ्यात आवक मंदावली आहे. परिणामी अर्थकारणावर मोठा परिणाम होण्यासोबतच मजुरांच्या हाताला काम मिळणेही जिकिरीचे झाले आहे.पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. आहे तो माल मोंढ्यात विक्री करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एरवी मोंढा म्हटला की, शेतकऱ्यांची गर्दी, धान्य कोठे ठेवावे, काढावे यासाठी व्यापाऱ्यांसह हमालांसोबत होणारी हुज्जत अन् धान्य विक्रीतून मिळणारी चांगली रक्कम पाहून शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर दिसणारे समाधान सर्व काही अलबेल असल्याचे सांगून जाते. दुष्काळामुळे हे चित्र आता धूसर झाले आहे. मृग नक्षत्र लागताच पाऊस पडेल ही भरोसा कमी झाला आहे. परिणामी मोंढ्यातील एकूणच मोंढ्यांतील लाखोंचे व्यवहार आता हजारांत आले आहे.जालना बाजार समितीत गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, हरभरा, तूर तसेच इतर मालाची आवक होते. जालना मोंढ्यात स्वतंत्र बाजारपेठा असल्याने येथे होणारी आवक इतर मोंढ्यांच्या तुलनेत निश्चित जास्त आहे. परंतु दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाच्या फेऱ्यामुळे ठप्प होत आहे. गतवर्षी व यंदाच्या आवकची तफावतीलमधील दरी जास्त नसली तरी आवक नसल्याने अर्थकारणावर परिणाम झाला आहे. मे २०१६ अखेर गहू १९६२, ज्वारी २६९३५, बाजरी ५०६२, मका १४९४८, हरभरा ३३४८, तूर ४३७६, सोयाबीन १७२३ क्विंटलची आवक झाली. आडत व्यापारी सुदर्शन भुंबर म्हणाले, दुष्काळ व पाऊस लांबल्याने मोंढ्यात शुकशुकाट आहे. किरकोळ स्वरूपाची आवक होत आहे. त्यामुळे अर्थकारणावर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांसोबतच हमाल मापाडीही त्रस्त आहेत. मोठ्या पावसाची गरज आहे. आडत व्यापारी नारायण भातपखाले, अशोक राऊत, वामनराव जगताप, रमेश दानवे, विष्णू गायकवाड, कृष्णा पवार, रामसेठ पल्लोड, रमेश तोष्णीवाल, त्र्यंबक जावळे आदी व्यापाऱ्यांनीही दुष्काळाची चिंता व्यक्त करून आवक मंदावल्याचे सांगितले.