शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

जायकवाडीत जेमतेम; मात्र वरील धरणांत मुबलक साठा

By admin | Updated: November 5, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा असला, तरी जायकवाडीच्या वरील भागात नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे मात्र काठोकाठ भरलेली आहेत.

औरंगाबाद : सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा असला, तरी जायकवाडीच्या वरील भागात नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे मात्र काठोकाठ भरलेली आहेत. भंडारदरा, दारणा, पालखेडसह बहुतेक धरणांमधील साठा ९५ टक्क्यांच्या जवळ आहे. सर्व धरणांचा एकत्रित विचार केल्यास दोन्ही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जायकवाडीत येणारे मराठवाड्याचे हक्काचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नगर, नाशिक जिल्ह्यांत अडविले जात आहे. त्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक घटली आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या मागणीसाठी अनेक संघटनांचा लढा सुरू आहे. त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महामंडळाला नुकतेच कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. अपरिहार्य वापर काढून उर्वरित पाणी जायकवाडीत सोडावे, असे आदेशात म्हटले आहे. सद्य:स्थितीत वरच्या भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील १४ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८२ टक्के पाणी आहे. यातील १० मोठे प्रकल्प हे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात म्हणजे जायकवाडीच्या वर आहेत. त्यापैकी दारणा, करंजवन, भंडारदरा, कडवा ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत, तर दारणा, गंगापूर, भावली, पालखेड, मुळा या धरणांमध्येही ९१ टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे.