शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत जेमतेम; मात्र वरील धरणांत मुबलक साठा

By admin | Updated: November 5, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा असला, तरी जायकवाडीच्या वरील भागात नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे मात्र काठोकाठ भरलेली आहेत.

औरंगाबाद : सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा असला, तरी जायकवाडीच्या वरील भागात नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे मात्र काठोकाठ भरलेली आहेत. भंडारदरा, दारणा, पालखेडसह बहुतेक धरणांमधील साठा ९५ टक्क्यांच्या जवळ आहे. सर्व धरणांचा एकत्रित विचार केल्यास दोन्ही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जायकवाडीत येणारे मराठवाड्याचे हक्काचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नगर, नाशिक जिल्ह्यांत अडविले जात आहे. त्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक घटली आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या मागणीसाठी अनेक संघटनांचा लढा सुरू आहे. त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महामंडळाला नुकतेच कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. अपरिहार्य वापर काढून उर्वरित पाणी जायकवाडीत सोडावे, असे आदेशात म्हटले आहे. सद्य:स्थितीत वरच्या भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील १४ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८२ टक्के पाणी आहे. यातील १० मोठे प्रकल्प हे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात म्हणजे जायकवाडीच्या वर आहेत. त्यापैकी दारणा, करंजवन, भंडारदरा, कडवा ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत, तर दारणा, गंगापूर, भावली, पालखेड, मुळा या धरणांमध्येही ९१ टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे.