शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

औरंगाबादेतून हिवाळ्यात दोन विमाने सुरू होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:24 IST

येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देस्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे, ती कंपनीही सेवा देणार आहे.

औरंगाबाद : येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे. दिल्लीहून औरंगाबादला विमान सुरू होईल. दिल्ली ते औरंगाबाद आणि बंगळुरू असे विमान हिवाळ्यात सुरू होईल. स्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे. ती कंपनीही सेवा देणार आहे. कंपन्या पूर्ण अभ्यास करून सेवा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय समितीची सोमवारी विभागीय आयुक्तालयात औरंगाबाद विमानतळाची आंतराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि डोमेस्टिक एअर सर्व्हिस या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीत इंधनावरील ५ टक्के असलेला व्हॅट आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणातील निधीमधील तफावत याबाबत विमान कंपन्यांनी सवलतींच्या अंगाने चर्चा केली. 

बैठकीला खा. चंद्रकांत खैरे, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव उषा पाधी, रुबिना अली, पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी गंगाधरन, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, हॉटेल असोसिएशन, टूरिझम प्रमोटेड गिल्ड, ट्रॅव्हल्स असोसिएशनसह ९ विमान कंपन्यांचे सीईओ, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीची माहिती देताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये उद्योग, अर्थकारण वाढले; परंतु विमानसंख्या कमी झाली आहे. विमान संख्या आणि प्रवासी वाढण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. हिवाळ्यापासून नवीन विमाने देण्याबाबत कंपन्यांनी मान्य केले आहे. लवकरच त्याची घोषणा कंपन्या करतील. सर्व संघटनांनी औरंगाबादेतील विमान प्रवासासाठी असलेल्या महत्त्वाच्या बाबी विमान कंपन्यांसमोर मांडल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी सध्या ५ विमाने जातात. येणाऱ्या काही महिन्यांत बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बोधगयासाठी डोमेस्टिक कनेक्टिव्हिटी मिळेल. सार्क व एशियन देशांना औरंगाबाद येथे विमान सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही.  आंतरराष्ट्रीय विमानसेवाही मिळेल. 

...तर दर कमी होणे शक्यऔरंगाबादेतून विमान सेवेचे दर जास्त आहेत. फक्त दिल्ली आणि मुंबई कनेक्टिव्हिटी मागत राहिल्यास तेथे विमान उतरण्यास जागा नाही. त्यामुळे मक्तेदारी निर्माण झाल्याने दर कमी होत नाहीत. बंगळुरू, अहमदाबादकडे जाणारी सेवा मिळाल्यास स्पर्धा निर्माण होईल आणि दर कमी होतील, असा दावा भोगले यांनी केला.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानGovernmentसरकार