शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

औरंगाबादेतून हिवाळ्यात दोन विमाने सुरू होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:24 IST

येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देस्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे, ती कंपनीही सेवा देणार आहे.

औरंगाबाद : येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे. दिल्लीहून औरंगाबादला विमान सुरू होईल. दिल्ली ते औरंगाबाद आणि बंगळुरू असे विमान हिवाळ्यात सुरू होईल. स्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे. ती कंपनीही सेवा देणार आहे. कंपन्या पूर्ण अभ्यास करून सेवा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय समितीची सोमवारी विभागीय आयुक्तालयात औरंगाबाद विमानतळाची आंतराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि डोमेस्टिक एअर सर्व्हिस या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीत इंधनावरील ५ टक्के असलेला व्हॅट आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणातील निधीमधील तफावत याबाबत विमान कंपन्यांनी सवलतींच्या अंगाने चर्चा केली. 

बैठकीला खा. चंद्रकांत खैरे, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव उषा पाधी, रुबिना अली, पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी गंगाधरन, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, हॉटेल असोसिएशन, टूरिझम प्रमोटेड गिल्ड, ट्रॅव्हल्स असोसिएशनसह ९ विमान कंपन्यांचे सीईओ, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीची माहिती देताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये उद्योग, अर्थकारण वाढले; परंतु विमानसंख्या कमी झाली आहे. विमान संख्या आणि प्रवासी वाढण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. हिवाळ्यापासून नवीन विमाने देण्याबाबत कंपन्यांनी मान्य केले आहे. लवकरच त्याची घोषणा कंपन्या करतील. सर्व संघटनांनी औरंगाबादेतील विमान प्रवासासाठी असलेल्या महत्त्वाच्या बाबी विमान कंपन्यांसमोर मांडल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी सध्या ५ विमाने जातात. येणाऱ्या काही महिन्यांत बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बोधगयासाठी डोमेस्टिक कनेक्टिव्हिटी मिळेल. सार्क व एशियन देशांना औरंगाबाद येथे विमान सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही.  आंतरराष्ट्रीय विमानसेवाही मिळेल. 

...तर दर कमी होणे शक्यऔरंगाबादेतून विमान सेवेचे दर जास्त आहेत. फक्त दिल्ली आणि मुंबई कनेक्टिव्हिटी मागत राहिल्यास तेथे विमान उतरण्यास जागा नाही. त्यामुळे मक्तेदारी निर्माण झाल्याने दर कमी होत नाहीत. बंगळुरू, अहमदाबादकडे जाणारी सेवा मिळाल्यास स्पर्धा निर्माण होईल आणि दर कमी होतील, असा दावा भोगले यांनी केला.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानGovernmentसरकार