शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतून हिवाळ्यात दोन विमाने सुरू होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:24 IST

येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देस्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे, ती कंपनीही सेवा देणार आहे.

औरंगाबाद : येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे. दिल्लीहून औरंगाबादला विमान सुरू होईल. दिल्ली ते औरंगाबाद आणि बंगळुरू असे विमान हिवाळ्यात सुरू होईल. स्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे. ती कंपनीही सेवा देणार आहे. कंपन्या पूर्ण अभ्यास करून सेवा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय समितीची सोमवारी विभागीय आयुक्तालयात औरंगाबाद विमानतळाची आंतराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि डोमेस्टिक एअर सर्व्हिस या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीत इंधनावरील ५ टक्के असलेला व्हॅट आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणातील निधीमधील तफावत याबाबत विमान कंपन्यांनी सवलतींच्या अंगाने चर्चा केली. 

बैठकीला खा. चंद्रकांत खैरे, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव उषा पाधी, रुबिना अली, पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी गंगाधरन, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, हॉटेल असोसिएशन, टूरिझम प्रमोटेड गिल्ड, ट्रॅव्हल्स असोसिएशनसह ९ विमान कंपन्यांचे सीईओ, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीची माहिती देताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये उद्योग, अर्थकारण वाढले; परंतु विमानसंख्या कमी झाली आहे. विमान संख्या आणि प्रवासी वाढण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. हिवाळ्यापासून नवीन विमाने देण्याबाबत कंपन्यांनी मान्य केले आहे. लवकरच त्याची घोषणा कंपन्या करतील. सर्व संघटनांनी औरंगाबादेतील विमान प्रवासासाठी असलेल्या महत्त्वाच्या बाबी विमान कंपन्यांसमोर मांडल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी सध्या ५ विमाने जातात. येणाऱ्या काही महिन्यांत बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बोधगयासाठी डोमेस्टिक कनेक्टिव्हिटी मिळेल. सार्क व एशियन देशांना औरंगाबाद येथे विमान सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही.  आंतरराष्ट्रीय विमानसेवाही मिळेल. 

...तर दर कमी होणे शक्यऔरंगाबादेतून विमान सेवेचे दर जास्त आहेत. फक्त दिल्ली आणि मुंबई कनेक्टिव्हिटी मागत राहिल्यास तेथे विमान उतरण्यास जागा नाही. त्यामुळे मक्तेदारी निर्माण झाल्याने दर कमी होत नाहीत. बंगळुरू, अहमदाबादकडे जाणारी सेवा मिळाल्यास स्पर्धा निर्माण होईल आणि दर कमी होतील, असा दावा भोगले यांनी केला.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानGovernmentसरकार