शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लढतींचे चित्र होणार स्पष्ट !

By admin | Updated: October 1, 2014 00:46 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. मंगळवारी तुळजापूर मतदार संघातील २ तर उस्मानाबाद मतदार संघातील तिघांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. १ आॅक्टोबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने यानंतर चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच अपक्षांची संख्याही भरमसाठ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर इतकी आहे. मंगळवार अखेर तुळजापूर आणि उस्मानाबाद या विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे दोन आणि तीन अशा पाच जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये तुळजापूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुचीता जीवनराव गोरे आणि अतुल नागनाथ जवान या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच उस्मानाबाद मतदार संघातील भीमाशंकर जाधव, केरबा विठ्ठल गाढवे आणि शिवाजी कापसे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आणखी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी आणखी एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बुधवारी चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.उमरग्यात बंड नाहीउमरगा विधानसभा मतदारसंघातून गुंजोटी येथील शिवसेनेच्या विलास व्हटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र एबी फॉर्म विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना गेल्याने व्हटकर यांचा अर्ज सोमवारी बाद ठरला होता. अशीच स्थिती इतर काही उमेदवारांचीही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतीश सरवदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी प्रा. विजय क्षीरसागर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एबी फॉर्म देवून त्यांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे सरवदे यांचाही अर्ज एबी फॉर्मअभावी बाद ठरला. त्यामुळे उमरगा मतदारसंघात बंडाचे निशान फडकण्याची शक्यता उरलेली नाही. (वार्ताहर)काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर तुळजापूर मतदार संघातून उमेदवारीसाठी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे नाव आघाडीवर होते. निवडणूकीच्या अनुषंगाने धुरगूडे यांनी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. ऐनवेळी पक्षाने महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरविले. त्यामुळे नाराज झालेल्या धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुरगुडे माघार घेतील असे, सुरूवातील बोलले जात होते. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाही त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी मागे घेवू नये असा आग्रह त्यांच्या समर्थकांचा आहे. दूसरीकडे राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे. जीवनराव गोरे यांनीही मंगळवारी त्यांच्या घरी जावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे धुरगुडेंची मनधरणी करण्यात पक्ष श्रेष्ठी यशस्वी होते की नाही, हे बुधवारीच स्पष्ट होेणार आहे.