शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

लढतींचे चित्र होणार स्पष्ट !

By admin | Updated: October 1, 2014 00:46 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. मंगळवारी तुळजापूर मतदार संघातील २ तर उस्मानाबाद मतदार संघातील तिघांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. १ आॅक्टोबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने यानंतर चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच अपक्षांची संख्याही भरमसाठ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर इतकी आहे. मंगळवार अखेर तुळजापूर आणि उस्मानाबाद या विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे दोन आणि तीन अशा पाच जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये तुळजापूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुचीता जीवनराव गोरे आणि अतुल नागनाथ जवान या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच उस्मानाबाद मतदार संघातील भीमाशंकर जाधव, केरबा विठ्ठल गाढवे आणि शिवाजी कापसे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आणखी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी आणखी एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बुधवारी चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.उमरग्यात बंड नाहीउमरगा विधानसभा मतदारसंघातून गुंजोटी येथील शिवसेनेच्या विलास व्हटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र एबी फॉर्म विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना गेल्याने व्हटकर यांचा अर्ज सोमवारी बाद ठरला होता. अशीच स्थिती इतर काही उमेदवारांचीही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतीश सरवदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी प्रा. विजय क्षीरसागर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एबी फॉर्म देवून त्यांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे सरवदे यांचाही अर्ज एबी फॉर्मअभावी बाद ठरला. त्यामुळे उमरगा मतदारसंघात बंडाचे निशान फडकण्याची शक्यता उरलेली नाही. (वार्ताहर)काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर तुळजापूर मतदार संघातून उमेदवारीसाठी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे नाव आघाडीवर होते. निवडणूकीच्या अनुषंगाने धुरगूडे यांनी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. ऐनवेळी पक्षाने महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरविले. त्यामुळे नाराज झालेल्या धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुरगुडे माघार घेतील असे, सुरूवातील बोलले जात होते. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाही त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी मागे घेवू नये असा आग्रह त्यांच्या समर्थकांचा आहे. दूसरीकडे राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे. जीवनराव गोरे यांनीही मंगळवारी त्यांच्या घरी जावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे धुरगुडेंची मनधरणी करण्यात पक्ष श्रेष्ठी यशस्वी होते की नाही, हे बुधवारीच स्पष्ट होेणार आहे.