शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

औरंगाबादमध्ये पहिला रुग्ण आढळल्याला झाले १०० दिवस; आज बहुतांश भागात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:42 IST

शहरात १५ मार्च रोजी पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे झाले होते निदान 

ठळक मुद्देशहरात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते.या १०० दिवसांत रुग्णसंख्येने एकवरून थेट साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

औरंगाबाद : शहरात पहिल्या रुग्णाचे निदान होऊन २२ जून रोजी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या १०० दिवसांत रुग्णसंख्येने एकवरून थेट साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने  चिंता व्यक्त होत आहे. 

शहरात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या प्राध्यापक महिलेचा अहवाल यादिवशी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ६०० लोकांची तपासणी केली; परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाहीत. हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आणि आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिलपासून नवे रुग्ण सापडत गेले.

शहरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती निगेटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे शहर दुसऱ्या टप्प्यापासून दूर होते. मात्र, त्यानंतर आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर दुसऱ्या टप्प्यात पोहोचले. वाढत्या संख्येने आता शहर तिसऱ्या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. १५ मार्चपासून २६ एप्रिल रोजी एकेरी संख्येतच कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत गेले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी कोरोनाने दुहेरी संख्येत शिरकाव केला. या तारखेपासून शहरात रोज दुहेरी आकड्यांत कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत आहे. यात ८ मे रोजी पहिल्यांदा तिहेरी आकड्यात रुग्णांचे निदान झाले. यादिवशी १०० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तर आता कोरोनाच्या रुग्णसंख्येने दिवसभरात दीडशेचा आकडाही पार केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज नव्या रुग्णांचे निदान होत आहे. धक्कादायक म्हणजे सुरुवातीला काही भागांत मर्यादित असलेल्या कोरोनाने शहरातील बहुतांश भागांत शिरकाव केला आहे. शहराची ही परिस्थिती अवघ्या १०० दिवसांत झाली आहे.

जूनमध्ये 56% रुग्ण : औरंगाबादेत १५ मार्च ते ३१ मेपर्यंत म्हणजे ७८ दिवसांत १५४३ रुग्णांचे निदान झाले होते. मात्र, जूनच्या २१ दिवसांत रविवारी सायंकाळपर्यंत १९७२ रुग्णांचे निदान झाले. १०० दिवस पूर्ण होताना रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर गेली. एकूण ५६ टक्के रुग्ण जूनमध्ये आढळून आले.

अशी वाढली संख्या : औरंगाबादेत मार्चमध्ये केवळ एक रुग्ण होता. एप्रिलअखेर ही संख्या १७७ झाली. त्यानंतर ३१ मेपर्यंत एकूण रुग्णसंख्या १५४३ झाली. एकट्या मे महिन्यात १३६६ रुग्ण आढळून आले. त्यानंतर जूनच्या २१ दिवसांत मे महिन्यापेक्षाही अधिक रुग्ण आढळले आहेत.

लॉकडाऊन संपले, कोरोना नाही : १५ मार्च रोजी निदान झाले होते, तेव्हा वेळीच उपचार घेतला. ते अधिक महत्त्वाचे ठरले. माझ्या संपर्कातील कोणालाही बाधा झाली नाही, ही मोठी समाधानाची बाब होती. मी १५ एप्रिलपासून कामही सुरू केले आहे. आॅनलाईन शिकविले जात आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन संपले म्हणून कोरोना गेला असे नाही. जबाबदारी पार पाडली पाहिजे. स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. - पहिल्या पॉझिटिव्ह आणि कोरोनामुक्त प्राध्यापिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद