शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठासह शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे सहा महिन्यांत भरणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:34 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश धुडकावले जाण्याची राज्यात शक्यताच अधिक

ठळक मुद्देरिक्त असलेल्या पदांच्या ४० टक्के पदे भरण्याचे धोरण बदलावे लागेल.विद्यापीठ अनुदान आयोगाने आगामी सहा महिन्यांत रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आदेश दिल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील केंद्रीय विद्यापीठांसह सर्वच शिक्षण संस्थांना आगामी सहा महिन्यांत रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या पदांच्या ४० टक्के पदे भरण्याचे धोरण बदलावे लागेल. विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. 

राज्यात येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वीच शासनाला विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा सहा महिन्यांत महाविद्यालय, विद्यापीठातील रिक्त पदे भरणे महाकठीण काम असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महाविद्यालयातील नोकरभरतीवर बंदी घातली होती.

 लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या एक महिना अगोदर ही बंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. महाविद्यालयातील शिक्षक संवर्गाच्या रिक्त पदांपैकी ४० टक्के पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली. यात उपनियम करत ज्या महाविद्यालयांमध्ये एकूण पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात आली आहेत. त्या महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यास नाकारण्यात आले. या जाचक अटी आणि आरक्षणाची बिंदुनामावली तपासण्यावरून गोंधळ उडाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकापूर्वी काही महाविद्यालयातील रिक्त पदांच्या जाहिराती देण्यात आल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्व प्रक्रिया पुन्हा थांबविण्यात आली. ही प्रक्रिया पुन्हा २६ मे पासून सुरू केली आहे.

राज्यात शासन अनुदानित महाविद्यालयांची संख्या ११७१ एवढी आहे. या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा आकडा १३ हजारांवर पोहोचला आहे, तर अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची संख्याही हजाराच्या घरात पोहोचली आहे. रिक्त पदांच्या तुलनेत शासनाने ४० टक्के पदे भरण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार  ३५८० पदे भरण्यात येणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील एक पद भरण्यास कागदोपत्री मंजुरी देण्यात आली. मात्र, हे पद प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात येत नसल्याची वास्तव परिस्थिती आहे. त्यामुळे यूजीसीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सहा महिन्यांत करणे ही महाकठीण बाब असल्याची वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे.

उच्चस्तर शिक्षा अभियानातर्फे (रुसा) मागील वर्षी संपूर्ण रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ ४० टक्के पदे भरण्यास मंजुरी दिली. तासिका तत्त्वावरील मानधन वाढ करूनही ती देण्यात येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सहा महिन्यांत हे शासन पदे भरणार नाही. -डॉ. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, नव प्राध्यापक संघटना

टॅग्स :universityविद्यापीठState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारEducationशिक्षणProfessorप्राध्यापक