शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

दलित वस्त्यांच्या कामांचा मुद्दा ऐरणीवरच

By admin | Updated: February 16, 2016 23:36 IST

हिंगोली : समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करूनही कामांचा पत्ता नाही.

हिंगोली : समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करूनही कामांचा पत्ता नाही. पंचायत समितीकडून पत्राचे नाहक भांडवल केले जात असेल तर प्रत्येक काम तेवढ्याच काटेकोरपणे होते काय? हे तपासावे लागेल, असा इशारा जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांनी दिला.यंदाची दुष्काळी स्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईमुळे कामे रखडता कामा नये, ही खूणगाठ बांधून दलित वस्ती सुधार योजनेचे वेळेत नियोजन केले होते. या योजनेत मंजूर असलेला सर्व १९.१४ कोटी रुपयांचा निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर संपूर्ण ३१७ दलित वस्त्यांमध्ये कामे करण्यास मंजुरी दिलेली आहे. परंतु ३ लाखांवरील कामांना ई-निविदा काढण्याचा शासन आदेश आल्यानंतर ही कामे ठप्प पडली होती. ही कामे करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींची अडचण झाली होती. मात्र जुन्या व नव्या शासन निर्णयाचा संदर्भ देत शासनाने मार्गदर्शक सूचना देत सक्षम ग्रामपंचायतींनी मागणी केल्यास त्यांना स्वत: कामे करता येतील, असे पत्र दिले होते. त्याचा आधार घेत पंचायत विभागाने बीडीओंना पत्र दिले. त्यानंतर जनसुविधा योजनेतील कामे सुरू झाली. मात्र हा निकष समाजकल्याणचे काम असल्याने तेथे लागू होत नसल्याचे काही बीडीओ म्हणत आहेत. यात समाजकल्याणचे पत्र लागणार असल्याचे ते म्हणतात. मात्र पूर्वी समाजकल्याणच्या शासन निर्णय ग्रामपंचायतींना लागू होत नाही, ग्रामविकासचाच हवा, अशी भूमिका घेतली गेली होती. या सोयीच्या अर्थ काढण्याच्या पद्धतीमुळे उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे जाम भडकले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत जो निर्णय घ्याचा तो वेळेत घेवून कामे मार्गी लागतील, याची काळजी घेण्याचे भ्रमणध्वनीवरून अधिकाऱ्यांना कळविले. तर समाज कल्याण विभागानेही पत्र देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)