शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४६६ उपायांनंतरही सिंचनाची बोंबच

By admin | Updated: April 16, 2016 01:35 IST

हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत आतापर्यंत बंधारे, तलावांची ४६६ कामे असताना त्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही.

हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत आतापर्यंत बंधारे, तलावांची ४६६ कामे असताना त्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. चुकीच्या साईट, अपुरे पर्जन्यमान व शेतकऱ्यांची निष्काळजी आदी कारणांमुळे ६३३0 हेक्टरवर सिंचन होत असल्याचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे.हिंगोली जिल्ह्यात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे २0 आहेत. त्यातील अनेकांना गेट नाहीत. त्याची हाताळणी खुद्द लघुसिंचन विभाग करीत नाही. तर शेतकरी त्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट टाकण्याची कवायत करायला तयार नाहीत. यामुळे यावरून होणाऱ्या ४५२ हेक्टर सिंचनाची अपेक्षा फोल ठरत आहे. दरवर्षी नेमकी चार ते पाच गावेच या बंधाऱ्यांना गेट टाकतात. सिंचन तलावांची संख्या २३ आहे. सेनगावात सर्वाधिक ११ तलाव आहेत. हिंगोली-७, औंढा-३, कळमनुरी-२ अशी इतर तालुक्यांची स्थिती आहे. यातील बोटावर मोजण्याइतके सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केल्याने फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यातील जुन्या काही तलावांची तर चांगला पावसाळा झाल्यानंतरही योग्य पाणीसाठा होत नसल्याची बोंब आहे. तरीही त्यावर १९२९ हेक्टर सिंचन होते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. पाझर तलावांची संख्या ५९ आहे. त्यांचीही गत फार वेगळी नाही. यात हिंगोली-१0, सेनगाव-१७, औंढा-११, कळमनुरी-१८ व वसमत-८ अशी तालुकानिहाय स्थिती आहे. यावरून १९८७ हेक्टरला फायदा होतो, असे म्हणने आहे. त्यालाच अप्रत्यक्ष सिंचन असे म्हणायचे. मात्र या तलावांना पाझरच एवढा आहे की, काही ठिकाणी भर पावसाळ्यातही त्यात पाणी दिसत नाही. गावतलाव ७८ आहेत. यात हिंगोली-८, सेनगाव-२३, औंढा-२१, कळमनुरी-१८, वसमत-८ अशी संख्या असून त्याचा फायदा १२१२ हेक्टरला होतो, असा अंदाज आहे. जुन्या पद्धतीतच असलेले काही तलाव वगळले तर अनेक तलाव अतिक्रमणांच्या व पाण्याची चाल बदलण्याच्या नादात भरतच नाहीत. त्यांचाही फारसा फायदा होत असल्याचे चित्र नाही. (प्रतिनिधी)