शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वैजापुरात वाळूतस्करीत पोलिसांची भागीदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:06 IST

वैजापूर तालुक्यात वाळूच्या धंद्याला सध्या बरकत आली असून, यात पोलिसांचीच भागीदारी असल्याने या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत. कारवाई करणारी यंत्रणाच वाळूतस्करांच्या दावणीला बांधली गेल्याने शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैजापूर तालुक्यात वाळूच्या धंद्याला सध्या बरकत आली असून, यात पोलिसांचीच भागीदारी असल्याने या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत. कारवाई करणारी यंत्रणाच वाळूतस्करांच्या दावणीला बांधली गेल्याने शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.तालुक्यातील गोदावरी, शिवना नदीपात्रातून खुलेआम वाळू उपसा सुरू असून, याबाबत वैजापूर महसूल व पोलीस विभाग मात्र हातावर हात ठेवून गप्प आहेत. वाळूतस्करांवर कारवाई करणे गरजेचे असताना मुक्या अन् बहिºयावरच कारवाईचा बडगा उचलला जातो. या खेळातील राजा अन् वजीरच चोर असल्याने इतरांचे काय, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.भालगाव, नागमठाण, चेंडूफळ, अव्वलगाव, पुरणगाव व लासूरगाव गोदापात्रात दररोज २५ ते ३० हायवा ट्रक व ट्रॅक्टरने वाळूचा उपसा सुरू असून, रात्रीच्या वेळी तस्करी करण्यात येते. यासाठी तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाºयांना एका वाहनामागे २५ ते ५० हजार रुपये महिना वाळूमाफियांकडून देण्यात येतो. त्यामुळे तालुक्यात दररोज लाखो रुपयांची वाळूतस्करी राजरोस सुरू आहे. विशेष म्हणजे अवैध मार्गाने जमा होणारा महसूल शासनाच्या तिजोरीत न जाता वीरगाव, शिऊर व वैजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांच्या खिशात जात आहे. या परिसरात श्रीरामपूर, कोपरगाव, गंगापूर व वैजापूर येथील वाळूतस्करांचे वाळू उपशावरून अनेक वेळा वाद उफाळून आले आहेत. वाढत्या पैशामुळे तस्करांनी या भागातील महसूल व पोलीस यंत्रणाच दावणीला बांधली का, असा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी वीरगाव व शिऊर पोलीस ठाण्याला आयएसओने सन्मानित करण्यात आले. असे असतानाही अवैध धंदे बंद होण्याऐवजी फोफावले आहेत. अवैध वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी महसूल व पोलिसांवर आहे; मात्र या धाडी टाकताना काही पोलीस कर्मचाºयांचे या धंदेवाईकांशी एवढे सलोख्याचे संबंध निर्माण झाले की, आता त्यांनीच भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला आहे. अर्थात ही भागीदारी कुठेही रेकॉर्डवर नसल्याने कुणालाही सिद्ध करणे शक्य नाही; मात्र ही भागीदारी पोलीस खात्यात कुणापासूनच लपलेली नाही. खाकी वर्दीची भागीदारी असलेल्या या धंद्यांकडे धाडपथक सहसा जात नाही. काही पोलीस कर्मचाºयांनी आपले नातेवाईक व विश्वासू व्यक्तींच्या नावावर वाळूतस्करीसाठी वाहने घेतली आहेत. या वाहनातून अवैध वाळू वाहतूक सर्रास केली जाते. अन्य वाहनांना त्यापोटी हप्ता द्यावा लागतो; मात्र पोलिसांची वाहने म्हणून हप्ता घेतला जात नाही.विशेष पथकांचा सुळसुळाटवैजापूर तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी रस्त्यावर विशेष पथकांचा चांगलाच सुळसुळाट बघायला मिळतो; मात्र हा सुळसुळाट अवैध धंदे रोखण्यासाठी की चिरीमिरीसाठी, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. १० डिसेंबर रोजी नागमठाण व १३ डिसेंबरला भगूर फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या विशेष पथकाने पकडली; मात्र प्रत्येकी ४५ व ५५ हजार रुपये घेऊन परस्पर सेटलमेंट करीत वाहन सोडल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे.४सुरुवातीला विशेष पथकाच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे बंद पडले होते; मात्र या पथकातील काही अधिकाºयांच्या छुप्या आशीर्वादाने अवैध धंदे रात्रीच्या वेळी राजरोस सुरू झाले आहेत. त्यांचा मूळ हेतू फक्त ‘अर्थकारण’ असल्याचे दिसून येते.हॉटेलमध्ये होते डीलिंग४वैजापूर तालुक्यात काही स्थानिक पोलीस कर्मचारी साहेबांच्या आशीर्वादाने बºयाच दिवसांपासून तालुक्यातील एकाच ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. स्थानिक पोलीस कर्मचाºयांना तालुक्याचा अनुभव जास्त असल्याने हप्ते गोळा करण्यासाठी अधिकाºयांनी यांनाच आपले ‘राइट व लेफ्ट हँड’ बनवले आहे. हे पोलीस शहरातील लक्ष्मी टॉकीजजवळ असलेल्या हॉटेलमध्ये दिवसभर बसून वाळूमाफियांसोबत डीलिंग करताना दिसतात.