शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

गुंतवणूकदारांनी लावली चिरीमिरीची सवय; त्रास भोगताहेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:00 IST

फेरफारीचे ३९९५ प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत : मंडळ अधिकारी स्तरावर तीन-तीन महिने प्रस्ताव प्रलंबित

श्रीकांत पोफळेशेंद्रा : महसूल विभागाच्या आॅनलाईन संकेत स्थळावरील माहितीनुसार औरंगाबाद तालुक्यात मंडळ अधिकारी स्तरावर फेरफारीचे तब्बल ३९९५ प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्व भागात एमआयडीसीभोवती गुंतवणूकदारांनी फेरफारसाठी पैशांची सवय लावली. त्याचा त्रास होत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.आॅनलाईन ही प्रणाली शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु आजघडीला महसूलच्या अधिकृत आॅनलाईन संकेत स्थळावरील ताज्या माहितीनुसार मंडळ अधिकारी स्तरावर तब्बल ३९९५ प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहते. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार अर्ज दाखल झाला की तीन दिवसांत तो निकाली निघणे अपेक्षित आहे. परंतु तीन तीन महिने फेरीफरीचे प्रस्ताव मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात नेहमी वाद उपस्थित होत असतात. कृष्णापूरवाडी येथील एका शेतकºयाने अशाच प्रकरणामुळे आत्महत्या केली असूनसुद्धा परिस्थिती सुधारत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात एमआयडीसी आल्यानंतर या परिसरात मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी शेतजमिनी खरेदी केल्या. कोटी कोटी रुपयांचे व्यवहार या परिसरात झाले. अशा गुंतवणूकदारांची मालमत्ता त्यांच्या नावावर होण्यासाठी म्हणजे सातबारा उताºयावर त्यांचे नाव येण्यासाठी फेरफार नोंदी घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी संबंधित तलाठ्यामार्फत फेरीफारीचा प्रस्ताव मंडळ अधिकाºयांकडे पाठवला जातो. हा प्रस्ताव मंजूर झाला की सातबाºयावर खातेदाराच्या नावात बदल केल्या जातो. खरेदी खताच्या आधारे मालमत्ता खरेदी केलेल्या खातेदाराचे नाव सातबाºयावर घेतल्या जाते. त्यासाठी मोठमोठे गुंतवणूकदार पैसे देऊन तात्काळ प्रकरणे मंजूर करून घेतात. त्यामुळे चिरीमिरी झाल्याशिवाय फेरीफरीची प्रकरणे मंजूर होत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. फेरफर मंजुरीची अनेक प्रकरणे काही लालसेपोटी प्रलंबित आहे की, त्यामागे दुसरे कारण आहे, हा विषय बाजूला ठेवला तरी, प्रलंबित असलेल्या आकड्यांची संख्या पुष्कळ बोलकी आहे. रक्तातील नात्यात खातेफोड करायची असली तरी फेरफारची मंजुरी आवश्यक असते. नोकरदार नागरिकांनी सुद्धा एमआयडीसीच्या भोवती प्लॉट खरेदी केलेले आहेत. आपल्या पगारातून काटकसर करून त्यांनी जमा पैशात त्यांनी ही गुंतवणूक केलेली असते. अशा अनेक प्रलंबित प्रकरणामुळे शेतकºयांची व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, हे नक्की. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून तात्काळ ही प्रकरणे निकाली काढावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असतील, असे वाटत नाही. संकेतस्थळावर उपलब्ध माहिती चुकीची असू शकते. तरी सुद्धा मी या प्रकरणाची तात्काळ माहिती घेतो.-सतीश सोनी, तहसीलदार, औरंगाबाद

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी