शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

औरंगाबादेत राज्यस्तरीय दिगंबर जैन संमेलनात ५०० भावी वधू-वरांचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:44 IST

अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन रिसोड येथील उदयकुमार जोगी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील महावीर घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महामंत्री रमेश रणदिवे, अध्यक्ष जिनदास मोगले, मुख्य प्रवर्तक मंगलाताई गोसावी, कार्याध्यक्ष दिगंबरराव वायकोस, विलास जोगी, गणेश खोबरे, राहुल जोगी आदींची उपस्थिती होती.आचार्य आर्यनंदीजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने संमेलनास प्रारंभ झाला. प्रारंभी या वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष जिनदास मोगले व पाहुण्यांनी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश सांगून राज्यभरातून आलेल्या युवक, युवतींसह त्यांच्या पालकांचे स्वागत केले व जास्तीत जास्त विवाह जुळून यावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर बोलावून युवक व युवतींनी आपला परिचय करुन दिला. त्यामुळे रेशीमगाठी जुळण्याची ‘लगीनघाई’ दिवसभर येथे दिसली.काही युवकांनी घर, आई-वडिलांचा सांभाळ करणारी अनुरुप भावी पत्नी असावी तर काहींनी नोकरीवाली व उच्चशिक्षित युवतींना पसंती दर्शविली. काही युवतींनी निर्व्यसनी, व्यापारी, धार्मिक तर काही युवतींनी उच्चशिक्षित व नोकरीवाल्या भावी पतीला पसंती दाखविली. व्यापारी किंवा उद्योजक पतीला प्रथमच युवतींनी पसंती दर्शविली, हा चांगला बदल यावेळी दिसला. यामुळे हा मेळ जमविण्यासाठी आलेल्या युवक, युवतींसह पालक एकमेकांच्या भेटीगाठी घेत होते. कार्यक्रमासाठी परिचय संमेलनाच्या पदाधिकाºयांसह शोभाताई देशमाने, ज्योती मोगले, ऋषाली जोगी, संदीप वायकोस, सतीश जोगी, ममता अंबेकर, मीनाक्षी उदगीरकर, अजय वायकोस आदींनी परिश्रम घेतले. अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्टÑीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी भावी वधू-वरांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त विवाह लावण्याचे आवाहन केले. कार्याध्यक्ष डी.डी. वायकोस यांनी आभार मानून आगामी संमेलनात जास्तीत जास्त विवाह जुळवून साधेपणाने लग्नसोहळे साजरे करण्याचे आवाहन केले.