शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शिवसेनेने घेतल्या मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 19:27 IST

२०१४ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेला ११ जागा मिळाल्या.

ठळक मुद्देविद्यमानांना बोलावले नाही इच्छुक शिवसेना भवन परिसरात 

औरंगाबाद : विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेने मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती रविवारी दिवसभर मुंबईतील शिवसेना भवन येथे घेतल्या. विभागातील ४६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. काही जागांसाठी प्रतिसाद मिळाला तर काही जागांवर उमेदवार शोधावा लागेल, अशी परिस्थिती रविवारी समोर आली. 

२०१४ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर ३ जागा इतर पक्षांतील आमदारांनी प्रवेश केल्यामुळे वाढल्या. भाजपसोबत युती झाल्यानंतर मराठवाड्यातील किती जागा शिवसेनेच्या पदरात पडणार हे अद्याप ठरलेले नाही. परंतु सर्व जागांसाठी मुलाखती घेऊन पक्ष ताकदीचा आढावा आज घेण्यात आला. मराठवाड्यानंतर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 

रविवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. जालन्यातील ५ आणि औरंगाबादेतील ९, अशा १४ जागांसाठी मुलाखती झाल्या. उर्वरित जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरातून पूर्व मतदारसंघातून विधानसभा संघटक राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी यांनी, पश्चिममधून माजी नगरसेवक बन्सीलाल गांगवे, नगरसेवक मनोज गांगवे यांनी, मध्य मतदारसंघातून माजी आ.प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, सुहास दाशरथे, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ आदींनी मुलाखती दिल्या. औरंगाबाद ग्रामीणमधून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, संतोष माने, दिनेश मुथा, वैजापूरमधून प्रा.रमेश बोरणारे, आसाराम रोेटे, प्रकाश चव्हाण यांनी, सिल्लोड, पैठण, पश्चिम मतदारसंघांतून विद्यमान आमदार मुलाखतीसाठी आले नाहीत. कन्नडमधून उदयसिंह राजपूत, डॉ.अण्णा शिंदे यांनी तर फुलंब्रीतून विधानसभा संघटक बाबासाहेब डांगे, रमेश पवार, जिजा कोरडे आदींनी मुलाखती दिल्या.

प्रती इच्छुक तीन हजारप्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखांनी दिलेला पास मुलाखत देण्यासाठी गेलेल्या इच्छुकांकडे होता. प्रत्येक इच्छुकाला सदस्यत्व शुल्कापोटी १ हजार आणि मुलाखती शुल्क २ हजार असे तीन हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. १० ते १२ मिनिटे प्रत्येकासाठी मिळाले.

विद्यमानांना बोलावले नाही पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान आ.संजय शिरसाट, पैठणचे आ.संदीपान भुमरे, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार हे मुलाखतीसाठी नव्हते. याप्रकरणी आ.शिरसाट यांनी सांगितले, विद्यमान आमदारांसाठी मुलाखती नव्हत्या. इच्छुकांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मराठवाड्यात हदगाव, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर, वसमत, परभणी, जालना, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, उमरगा या जागांवर शिवसेनेचे उमेदवार २०१४ साली विजयी झाले होते. 

जागा वाटपावरून वादाची शक्यताजालन्यातील बदनापूरमधून २०१४ साली भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे यावेळी शिवसेनेला तो मतदारसंघ मिळणार की नाही, यावरून वाद होऊ शकतो. औरंगाबादमध्ये मध्य, गंगापूर येथील जागा वाटपावरून वाद होऊ शकतात. भाजपकडे असलेले काही मतदारसंघ सेनेला हवे आहेत. सेनेचा जिथे पराभव अटळ आहे, अथवा यापूर्वीच विजय मिळालाच नाही, ते मतदारसंघ भाजपला हवे आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMarathwadaमराठवाडाvidhan sabhaविधानसभा