शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये दक्षतेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:46 IST

शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

औरंगाबाद : शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मोठ्याप्रमाणावर झालेल्या हिंसाचारामागे किरकोळ कारण असले तरी याबाबत सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरून इतर ठिकाणी हिंसाचार पसरू नये म्हणून पोलिसांकडून ही दक्षता घेण्यात आली आहे. 

शुक्रवार मध्यरात्रीपासून शहरातील मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजार भागात तणाव होता. यातून झालेल्या हिंसाचाराने अचानक रोद्रूप धारण केले. यातून रात्रभर या भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांच्या माहितीनुसार हिंसाचारामागे किरकोळ कारण होते मात्र जमाव आक्रमक झाल्याने मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला. यामागे सोशल मिडियामधून पसरविण्यात आलेल्या अफवांचा मोठा हात असल्याचा संशय आहे.

यादरम्यान  शहराच्या इतर भागात शांतता होती. आज सकाळी याबाबत सोशल उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. हिंसाचाराचे फोटो, माहिती, बातम्या व्हायरल झाल्या. यामाध्यमातून परत एकदा शहरात अफवा पसरून इतर ठिकाणी याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. 

सध्या हिंसाचार झालेल्या भागात शांतता असून येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांची मोठी कुमकही या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. हिंसाचार भडकला तो अफवांमुळे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे पोलीस प्रशासना व लोकप्रतिनिधींकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदीshahaganjशहागंजAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसInternetइंटरनेट