शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत रस्तेही खराब

By admin | Updated: September 26, 2016 00:17 IST

बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली

बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली असून शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली आहे. आधीच या महामार्गावर खड्डे होते, पावसाने त्यात भर पडली, शिवाय पाणी साचून राहिल्याने आकारही वाढला. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट सुरु आहे. शहरातून गेलेल्या महामार्गावरील चार किमी अंतरावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरुन जाताना हा राष्ट्रीय महामार्गच आहे का? असा प्रश्न वाहनचालकांना पडल्यावाचून राहत नाही. या मार्गावरील खड्ड्यांची समस्या नित्याची बनली आहे;परंतु सलग दोन दिवसांच्या पावसाने खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत वाहने आदळून दुचाकीस्वारांना पाठ, मणक्याचे त्रास होऊ लागले आहेत. चारचाकी वाहनांचे सुटे भाग निखळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनचालकांप्रमाणेच पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे. बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व शाहूनगर रोड ते वळणरस्ता इथपर्यंत असंख्य खड्डे आहेत. अल्पशा पावसातही पाणी साचत असल्याने ते ओळखणेही कठीण बनत आहे. शाहूनगर रोड ते सेंट अ‍ॅन्स स्कूलपर्यंतचा महामार्ग दोन दिवस पाण्याखाली होता. खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वार महिला व मुलींना होतो. (प्रतिनिधी) वाहतूक वळवली तरीही.. ४बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीवरील निजामकालीन पूल कालबाह्य झाल्याने जडवाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरात वाहनसंख्या नियंत्रित राहील. मात्र, खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळू शकते, अशी स्थिती आहे. एकूणच वाहतूक वळविल्यानंतरही महामार्गामागचे ग्रहण कायम आहे. शहरातील पेठ बीड, धानोरा रोड, आदित्यनगरी, एकनाथनगर, पिंपरगव्हाण रोड, शाहूनगर, मोमीनपुरा, करीमपुरा, सुभाष रोड, मोंढा, स्वराज्यनगर, धांडेगल्ली, भाजीमंडई, पोलीस कॉलनी या भागातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. पावसाने नागरिकांची तारांबळ उडत असून खड्ड्यांतील पाणी अंगावर उडून येत असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.