शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

१६१ कोटींच्या रकमेवर २०० कोटींचे व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:03 IST

औरंगाबाद : नवीन पाणी पुरवठा योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ६३३ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. २००९ मध्ये केंद्र ...

औरंगाबाद : नवीन पाणी पुरवठा योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ६३३ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. २००९ मध्ये केंद्र शासनाने १४३ कोटी तर राज्य शासनाने २०११ मध्ये मनपाला समांतर जलवाहिनीसाठी १८ कोटी रुपये दिले होते. १६१ कोटींच्या या अनुदान रकमेवर १० वर्षांत तब्बल २०० काेटी रुपये व्याज जमा झाला आहे. मनपाकडे ३५० कोटी रुपये उपलब्ध आहेत. शासन मंजुरी घेऊन ही रक्कम नवीन पाणी पुरवठा योजनेत टाकण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे.

महाराष्ट्र शासनाने शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. योजनेतील पहिल्या टप्प्याचे १३०८ कोटी रुपयांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या योजनेत महापालिकेला सुमारे ६३३ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे. आधीच स्मार्ट सिटी योजनेत मनपाला २५० कोटी रुपयांची जुळवाजुळव करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. महापालिकेने वाटा टाकल्याशिवाय पुढील निधी मिळणार नाही, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतल्यामुळे जुलै महिन्यात सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी योजनेसाठी दिला जाईल, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित निधीसाठी स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले असून, त्यात महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या निधीचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी प्रशासनाला चिंता आहे ती १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील ६६३ कोटींच्या हिश्श्याची. समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीतील मूळ व व्याजाचे सुमारे ३५० कोटी वापरण्यात यावेत, असा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

--------------

२०० कोटींचे व्याज

समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी ३ नोव्हेंबर २००९ रोजी केंद्राकडून पहिल्या टप्प्यात १४३.८७ कोटी रुपये तर राज्य शासनाकडून ४ मे २०११ रोजी १७.९४ कोटी असे १६१.८१ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झालेले होते. ही रक्कम महापालिकेने बँकेत ठेवली आहे. त्यावर आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने योजनेचे काम करणाऱ्या तत्कालीन औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला गतवर्षी २९ कोटी रुपये दिले आहेत.