शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

१६१ कोटींच्या रकमेवर २०० कोटींचे व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:03 IST

औरंगाबाद : नवीन पाणी पुरवठा योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ६३३ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. २००९ मध्ये केंद्र ...

औरंगाबाद : नवीन पाणी पुरवठा योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ६३३ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. २००९ मध्ये केंद्र शासनाने १४३ कोटी तर राज्य शासनाने २०११ मध्ये मनपाला समांतर जलवाहिनीसाठी १८ कोटी रुपये दिले होते. १६१ कोटींच्या या अनुदान रकमेवर १० वर्षांत तब्बल २०० काेटी रुपये व्याज जमा झाला आहे. मनपाकडे ३५० कोटी रुपये उपलब्ध आहेत. शासन मंजुरी घेऊन ही रक्कम नवीन पाणी पुरवठा योजनेत टाकण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे.

महाराष्ट्र शासनाने शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. योजनेतील पहिल्या टप्प्याचे १३०८ कोटी रुपयांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या योजनेत महापालिकेला सुमारे ६३३ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे. आधीच स्मार्ट सिटी योजनेत मनपाला २५० कोटी रुपयांची जुळवाजुळव करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. महापालिकेने वाटा टाकल्याशिवाय पुढील निधी मिळणार नाही, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतल्यामुळे जुलै महिन्यात सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी योजनेसाठी दिला जाईल, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित निधीसाठी स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले असून, त्यात महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या निधीचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी प्रशासनाला चिंता आहे ती १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील ६६३ कोटींच्या हिश्श्याची. समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीतील मूळ व व्याजाचे सुमारे ३५० कोटी वापरण्यात यावेत, असा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

--------------

२०० कोटींचे व्याज

समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी ३ नोव्हेंबर २००९ रोजी केंद्राकडून पहिल्या टप्प्यात १४३.८७ कोटी रुपये तर राज्य शासनाकडून ४ मे २०११ रोजी १७.९४ कोटी असे १६१.८१ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झालेले होते. ही रक्कम महापालिकेने बँकेत ठेवली आहे. त्यावर आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने योजनेचे काम करणाऱ्या तत्कालीन औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला गतवर्षी २९ कोटी रुपये दिले आहेत.