शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

आंतरराज्य वाहतूक सुरळीत होणार

By admin | Updated: September 25, 2014 00:52 IST

जालना : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जालना-अंबड-वडीगोद्री या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. ४६.०६ कि़मी. अंतराचे हे काम लवकरच पूर्ण होणार

जालना : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जालना-अंबड-वडीगोद्री या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. ४६.०६ कि़मी. अंतराचे हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने या मार्गावरील तालुकास्थानांसह शेकडो खेड्यापाड्यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जालना-अंबड-वडीगोद्री हा रस्ता अरूंद असल्याने त्याचे चौपदरीकरणे होणे आवश्यक होते. पालकमंत्री राजेश टोपे यांनी शासन दरबारी या कामासाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्य महामार्ग क्रमांक १७६ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ३१३.६५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या दुपदरी रस्त्याच्या मध्य दुभाजकासह चौपदरीकरण करण्यात येणार आहे. जी.एस.बी. व खडीकरण डांबरीकरणासह मजबुतीकरण करण्यात येणार आहे.अस्तित्वातील सर्व लहान पूल, स्लॅब, ड्रेन व नळकांडी पुलांचे चार पदरी मानक रूंदीकरण करण्यात येणार आहे. जंक्शन सुधारणा करणे, संरक्षण भिंत बांधणे, वृक्ष लागवड करणे ही कामेही केली जाणार आहेत. याबाबत पालकमंत्री राजेश टोपे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, चौपदरीकरणामुळे जालना ते शहागड हे अंतर सुलभ होणार आहे. त्याचा फायदा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या परिसरातील उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)जालना-अंबड-वडीगोद्री हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुपदरीच आहे. दिवसेंदिवस बीड, सोलापूर मार्गावरील वाहतूक वाढल्याने हा रस्ता अत्यंत अरुंद पडू लागला. चार वर्षांपूर्वी याच रस्त्यावर पारनेर पाटीजवळ शेगाव दिंडीतील ११ वारकऱ्यांचा भरधाव कंटेनरच्या धडकेने मृत्यू झाला होता. त्यानंतर पालकमंत्री टोपे यांनी शासन पातळीवर या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रयत्न सुरू केले.४या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असून दळणवळणाच्या सुविधांमध्ये वाढ होणार आहे.