शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

गोदाखोऱ्यात एकात्मिक व्यवस्थापन यंत्रणा

By admin | Updated: August 20, 2014 00:47 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने उपलब्ध पाण्याच्या नियोजनासाठी उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात एकात्मिक जलसंपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पाणीवाटपावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेता राज्य शासनाने उपलब्ध पाण्याच्या नियोजनासाठी उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात एकात्मिक जलसंपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५४ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. जायकवाडीच्या वर उर्ध्व गोदावरी खोऱ्यात नगर, नाशिक जिल्ह्यांत काही वर्षांत अनेक प्रकल्प बांधले गेले. त्यामुळे जायकवाडीत पुरेसे पाणी येणे मुश्किल झाले आहे. परिणामी, काही वर्षांपासून जायकवाडी धरण रिकामे राहत आहे. त्यामुळे वरील धरणांतून हक्काचे पाणी सोडावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी सातत्याने आंदोलनेही सुरू आहेत.या वादाच्या पार्श्वभूमीवर शासनाने उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेचा अभ्यास करण्यासाठी जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक एच. टी. मेंढेगिरी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली होती. या अभ्यास गटाने काही शिफारशी केल्या होत्या. त्यात एकात्मिक जलसंपत्ती व्यवस्थापन सिस्टीम विकसित करण्याची शिफारस होती. शासनाने त्यासाठी ५४ कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅस्ट्रेलियाशी करारआॅस्ट्रेलियातील मरे डार्लिंग नदी खोऱ्याच्या पार्श्वभूमीवर उर्ध्व गोदावरी खोऱ्यात ही यंत्रणा राबविली जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी मरे डार्लिंग खोऱ्यात पाठविले जाणार आहे. त्यासाठी आॅस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स प्रांताशी करार करण्यात आला आहे.