शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

पालिका आयुक्तांना व्यक्तिश: हजर राहण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:08 IST

सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत महापालिकेने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (दि.१५) खंडपीठात व्यक्तिश: हजर राहावे, असा आदेश न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला आहे.

औरंगाबाद : सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत महापालिकेने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (दि.१५) खंडपीठात व्यक्तिश: हजर राहावे, असा आदेश न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला आहे.

सलीम अली सरोवरसंवर्धन समितीचे समन्वयक अरविंद पुजारी यांनी २०१३ मध्ये ही याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान पालिकेच्या भूमिकेवर खंडपीठानेतीव्र नाराजी व्यक्त केली होती. खंडपीठाने २ जानेवारी २०१४ रोजी जैवविविधता कमिटी नेमली. सरोवरातील जैवविविधतेच्या संवर्धनासंदर्भात शिफारशींसह दोन महिन्यांत राज्य शासनास अहवाल सादर करावा, असे आदेश या समितीला देण्यात आले होते. या सरोवराला बाधा येईल, असे कोणतेही काम करू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाने आॅक्टोबर २०१३ मध्ये दिला होता. हे आदेश आजही लागू आहेत.

सरोवरातील जैवविविधतेचे रक्षण करण्याआधी पालिका सरोवर परिसरात बांधकाम करून ते नष्ट करीत असल्याचा आक्षेप समितीतर्र्फे घेण्यात आला आहे. राज्य जैवविविधता मंडळाने औरंगाबाद महापालिका आयुक्तांना मार्च २०१३ मध्ये समिती स्थापन करण्यास सांगितले होते. महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे समजली जाणारी ठिकाणे शोधून त्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासंबंधी आराखडा तयार करण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली होती. पालिकेने समिती स्थापन करण्याची बाब गांभीर्याने घेतली नव्हती. हे सरोवर औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. या सरोवरात देश-विदेशातून १९६ प्रकारचे पक्षी येतात. यामुळे या तलावाला वेगळेच महत्त्व आहे. या सरोवरात ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्यामुळे तलावातील जीवजंतू, मासे व त्यावर अवलंबून असणाºया पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.या जैवविविधता समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश असावा, तसेच कायद्याप्रमाणे ही समिती असावी, असे आदेशात म्हटले होते. त्यात जीवशास्त्र, वन आणि मासे या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असावा, असेही ८ जानेवारी २०१४ च्या आदेशामध्ये म्हटले होते. या समितीने दोन महिन्यांत अहवाल तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवावा. राज्य शासनाने अहवाल प्राप्त होताच दोन महिन्यांत केंद्र शासनाकडे पाठवावा, असेही आदेशात म्हटले होते. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळेच सध्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना शुक्रवारी खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांची बाजू अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांनी मांडली. पालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, अ‍ॅड. आनंद कुलकर्णी, तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. एस.बी. यावलकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद