शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

पालिका आयुक्तांना व्यक्तिश: हजर राहण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:08 IST

सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत महापालिकेने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (दि.१५) खंडपीठात व्यक्तिश: हजर राहावे, असा आदेश न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला आहे.

औरंगाबाद : सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत महापालिकेने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (दि.१५) खंडपीठात व्यक्तिश: हजर राहावे, असा आदेश न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला आहे.

सलीम अली सरोवरसंवर्धन समितीचे समन्वयक अरविंद पुजारी यांनी २०१३ मध्ये ही याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान पालिकेच्या भूमिकेवर खंडपीठानेतीव्र नाराजी व्यक्त केली होती. खंडपीठाने २ जानेवारी २०१४ रोजी जैवविविधता कमिटी नेमली. सरोवरातील जैवविविधतेच्या संवर्धनासंदर्भात शिफारशींसह दोन महिन्यांत राज्य शासनास अहवाल सादर करावा, असे आदेश या समितीला देण्यात आले होते. या सरोवराला बाधा येईल, असे कोणतेही काम करू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाने आॅक्टोबर २०१३ मध्ये दिला होता. हे आदेश आजही लागू आहेत.

सरोवरातील जैवविविधतेचे रक्षण करण्याआधी पालिका सरोवर परिसरात बांधकाम करून ते नष्ट करीत असल्याचा आक्षेप समितीतर्र्फे घेण्यात आला आहे. राज्य जैवविविधता मंडळाने औरंगाबाद महापालिका आयुक्तांना मार्च २०१३ मध्ये समिती स्थापन करण्यास सांगितले होते. महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे समजली जाणारी ठिकाणे शोधून त्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासंबंधी आराखडा तयार करण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली होती. पालिकेने समिती स्थापन करण्याची बाब गांभीर्याने घेतली नव्हती. हे सरोवर औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. या सरोवरात देश-विदेशातून १९६ प्रकारचे पक्षी येतात. यामुळे या तलावाला वेगळेच महत्त्व आहे. या सरोवरात ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्यामुळे तलावातील जीवजंतू, मासे व त्यावर अवलंबून असणाºया पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.या जैवविविधता समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश असावा, तसेच कायद्याप्रमाणे ही समिती असावी, असे आदेशात म्हटले होते. त्यात जीवशास्त्र, वन आणि मासे या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असावा, असेही ८ जानेवारी २०१४ च्या आदेशामध्ये म्हटले होते. या समितीने दोन महिन्यांत अहवाल तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवावा. राज्य शासनाने अहवाल प्राप्त होताच दोन महिन्यांत केंद्र शासनाकडे पाठवावा, असेही आदेशात म्हटले होते. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळेच सध्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना शुक्रवारी खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांची बाजू अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांनी मांडली. पालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, अ‍ॅड. आनंद कुलकर्णी, तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. एस.बी. यावलकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद