शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा तयार करण्याचे निर्देश

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

औरंगाबाद : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा संयुक्तपणे तयार करावा, तसेच त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. आंचलिया यांनी दिले.

औरंगाबाद : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, एस.टी. महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे तयार करावा, तसेच त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. आंचलिया यांनी दिले.प्रवासी मिळविण्यासाठी मनमानीपणे धावणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा, टप्पा वाहतुकीची परवानगी घेऊन खुलेआम प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस, काळीपिवळी जीपचालकांची बेबंदशाही आणि सिग्नल तोडून पळणारे दुचाकीचालक यामुळे शहरातील वाहतूकव्यवस्था कोलमडून गेली आहे. बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याबाबत खंडपीठाने शहर पोलीस आणि आरटीओ यांना वेळोवेळी निर्देश दिले. त्यानुसार वाहतूक शाखेच्या वतीने अ‍ॅपे, रिक्षा आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली. त्यानंतरही शहरातील बेशिस्त वाहतूक जशी होती तशीच आहे. तीन महिन्यांपासून औरंगाबाद खंडपीठ शहरातील बेशिस्त वाहतुकीसंदर्भात पाठपुरावा करीत आहे. मात्र, बेशिस्त वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात सुमोटो अवमान याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेत न्यायालयाने पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, एस.टी.चे विभागीय व्यवस्थापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि आरटीओ यांंची संयुक्त समिती नेमून बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणारा आराखडा तयार करावा, या आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले. सर्वसमावेशक तोडगा काढून पथदर्शक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. या याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. आनंद भंडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी सरकार पक्षाकडून सहायक सरकारी लोकअभियोक्ता गिरीश नाईक-थिगळे यांनी बाजू मांडली.