शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांच्या याचिका नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:53 IST

एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र एम. बोर्डे व न्या. मंगेश एस. पाटील यांनी नामंजूर केल्या.

ठळक मुद्दे एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरताना झालेली चूक

औरंगाबाद : एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र एम. बोर्डे व न्या. मंगेश एस. पाटील यांनी नामंजूर केल्या.आॅनलाईन अर्ज भरताना महाविद्यालयाचा सांकेतांक आणि पुढे ‘एस’ (स्टेट) कोटा अथवा ‘एन’ (एनआरआय) कोटा याची निवड करणे आवश्यक होते; परंतु राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी चुकून राज्य कोट्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केली होती. परिणामी, प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. सीईटी सेलने एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १२ आॅगस्ट २०१८ रोजी जाहीर केली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ आॅगस्ट होती. निवड झालेल्या कोट्यातून प्रवेश घेतला नाही, तर विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार होते. राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. सदर याचिकांचा निकाल खंडपीठाने राखून ठेवला होता. तो जाहीर करण्यात आला.राज्य शासनातर्फे अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर, सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. मृगेश नरवाडकर आणि अ‍ॅड. सुजित कार्लेकर, तर याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विजय शर्मा, गजानन क्षीरसागर, शिरीष कांबळे, आर.आर. सूर्यवंशी, अरुण राख, गौतम पहिलवान, प्रीती वानखेडे, रवींद्र गोरे, अभय राठोड, जफर पठाण, एस.एस. काझी आदींनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र