शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांच्या याचिका नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:53 IST

एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र एम. बोर्डे व न्या. मंगेश एस. पाटील यांनी नामंजूर केल्या.

ठळक मुद्दे एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरताना झालेली चूक

औरंगाबाद : एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र एम. बोर्डे व न्या. मंगेश एस. पाटील यांनी नामंजूर केल्या.आॅनलाईन अर्ज भरताना महाविद्यालयाचा सांकेतांक आणि पुढे ‘एस’ (स्टेट) कोटा अथवा ‘एन’ (एनआरआय) कोटा याची निवड करणे आवश्यक होते; परंतु राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी चुकून राज्य कोट्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केली होती. परिणामी, प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. सीईटी सेलने एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १२ आॅगस्ट २०१८ रोजी जाहीर केली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ आॅगस्ट होती. निवड झालेल्या कोट्यातून प्रवेश घेतला नाही, तर विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार होते. राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. सदर याचिकांचा निकाल खंडपीठाने राखून ठेवला होता. तो जाहीर करण्यात आला.राज्य शासनातर्फे अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर, सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. मृगेश नरवाडकर आणि अ‍ॅड. सुजित कार्लेकर, तर याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विजय शर्मा, गजानन क्षीरसागर, शिरीष कांबळे, आर.आर. सूर्यवंशी, अरुण राख, गौतम पहिलवान, प्रीती वानखेडे, रवींद्र गोरे, अभय राठोड, जफर पठाण, एस.एस. काझी आदींनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र