शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सातारा परिसरात रस्ते बनविण्याऐवजी खडी उचलण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:09 IST

सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

औरंगाबाद : सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.बायपासपासून ते अंतर्गत रस्त्यांवर खडी टाकून रस्ता तयार करण्याचे काम अगदी कासवगतीने सुरू आहे. रस्ता तयार होत असल्याने नागरिकांनीही अडचणीतून येणे-जाणे सहन केले आहे; परंतु रस्त्याला पूर्णत्वाकडे नेण्याऐवजी त्यावर टाकलेली खडीच ठेकेदाराने मजुरांमार्फत उचलून नेण्याचा अफलातून प्रकार समोर आला. नागरिकांनी खडी उचलून नेण्यास प्रचंड विरोध करीत मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पावसाळ्यापूर्वी तरी रस्ता पूर्ण करावा, अशी अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. संघर्ष केल्याशिवाय नागरिकांना कोणतीच सेवा-सुविधा देण्यात येत नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचा सूर आहे.रेणुकामाता कमान, एमआयटी रस्ता, आमदार रोड, सुधाकरनगर रोड, आयप्पा मंदिरामागील अलोकनगरात जाणाºया रस्त्यावरही तीच अवस्था आहे. सर्वच रस्ते अपूर्ण अवस्थेत सोडले असून, रस्त्यावर टाकलेली खडीची दबाई करण्याऐवजी ती उचलून नेली जात असल्याने संताप व्यक्त होतो आहे.नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू नकारस्ते तयार करण्याऐवजी खडी उचलून नेणाºयावर मनपाने गुन्हे दाखल करावेत, विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू नका.-अरुण पाटीलअपूर्ण रस्ते त्वरित पूर्ण करासातारा-देवळाईतील रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामाकडे मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी तरी रस्ते पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.-शेखर म्हस्के 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा