शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

गाळ खाणाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: May 31, 2016 00:49 IST

औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिले.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिले. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन आणि विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरियांच्या कार्यशैलीवर पालकमंत्र्यांनी ताशेरे ओढले. ‘लोकमत’ ने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला. गाळ आणि खर्च यावरून विभागीय प्रशासन आणि पालिका प्रशासनाची सदस्यांनी उलटतपासणी केली. शासनाने दोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच वेळी तो निधी मनपाकडे वर्ग झाला होता. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या. ३५० रुपये क्युबिक मीटरप्रमाणे गाळ काढण्यासाठी दर निविदा तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी मंजूर केली. मुळात आजघडीला २५ ते ३० रुपये प्रतिक्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी खर्च येत असताना मनपाने ३५० रुपये का दिले, असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. शेतकरी गाळ स्वत:हून घेऊन जाण्यास तयार असतात. मनपाने फक्त तो काढून देणे गरजेचे होते; परंतु तसे न करता २ कोटी रुपयांची विल्हेवाट लावण्यासाठी ही रक्कम गाळात घातली काय, असा सवाल आ. सुभाष झांबड यांनी केला. डीपीडीसीच्या बैठकीत फक्त चर्चा होते. आजवर कुणावरही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आ. अतुल सावे म्हणाले, कंत्राटदारांनी गाळ विकला आहे. त्याला डबल फायदा या कामातून झाला आहे. आ. शिरसाट म्हणाले, ३५ ते ४० कोटी रुपये खर्च येत असताना २ कोटी रुपयांत तलाव गाळमुक्त कसा होणार. महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, यासाठी निधी कुठून आला आणि त्याचे नियोजन कसे झाले हेदेखील प्रशासनाने सांगावे. विभागीय आयुक्त डॉ.दांगट म्हणाले, २ वर्षांपूर्वी शासनाने २ कोटी रुपये दिले होते. तेव्हा मनपाने आजवर त्या कामाला सुरुवात केली नाही. टंचाई असल्यामुळे गाळ काढण्यासाठी मनपाकडे आग्रह धरला. तलावाचे क्षेत्र ३०० हेक्टर आहे. या प्रकरणात मनपाला चौकशीचे आदेश दिले आहेत. आयुक्त बकोरिया म्हणाले, चौकशी करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी गाळ काढण्याचे कंत्राट का तपासले नाही. त्याच कंत्राटदाराला सध्या काम का दिले. तत्कालीन आयुक्तांनी निविदा तपासल्या नाहीत. विद्यमान आयुक्तांनी निविदा का तपासल्या नाहीत.४दोन वर्षांपूर्वीचा व्यवहार कायदेशीररीत्या योग्य आहे की नाही हे आयुक्तांना का तपासावे वाटले नाही. दोन्ही आयुक्तांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, असे माझे मत आहे. दांगट यांनी चौकशी करावी, असे आदेश पालकमंत्री कदम यांनी दिले.‘मनपाने गाळ खाल्लाच’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून मनपा आणि विभागीय प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. सोमवारी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ.सुभाष झांबड, आ.संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे यांनी लोकमतच्या वृत्तावरून मनपा आणि विभागीय प्रशासनाची झाडाझडती घेतली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देऊन गाळात कोणकोण अडकले आहेत, याचा अहवाल देण्यास सांगितले.