शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

गाळ खाणाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: May 31, 2016 00:49 IST

औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिले.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिले. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन आणि विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरियांच्या कार्यशैलीवर पालकमंत्र्यांनी ताशेरे ओढले. ‘लोकमत’ ने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला. गाळ आणि खर्च यावरून विभागीय प्रशासन आणि पालिका प्रशासनाची सदस्यांनी उलटतपासणी केली. शासनाने दोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच वेळी तो निधी मनपाकडे वर्ग झाला होता. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या. ३५० रुपये क्युबिक मीटरप्रमाणे गाळ काढण्यासाठी दर निविदा तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी मंजूर केली. मुळात आजघडीला २५ ते ३० रुपये प्रतिक्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी खर्च येत असताना मनपाने ३५० रुपये का दिले, असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. शेतकरी गाळ स्वत:हून घेऊन जाण्यास तयार असतात. मनपाने फक्त तो काढून देणे गरजेचे होते; परंतु तसे न करता २ कोटी रुपयांची विल्हेवाट लावण्यासाठी ही रक्कम गाळात घातली काय, असा सवाल आ. सुभाष झांबड यांनी केला. डीपीडीसीच्या बैठकीत फक्त चर्चा होते. आजवर कुणावरही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आ. अतुल सावे म्हणाले, कंत्राटदारांनी गाळ विकला आहे. त्याला डबल फायदा या कामातून झाला आहे. आ. शिरसाट म्हणाले, ३५ ते ४० कोटी रुपये खर्च येत असताना २ कोटी रुपयांत तलाव गाळमुक्त कसा होणार. महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, यासाठी निधी कुठून आला आणि त्याचे नियोजन कसे झाले हेदेखील प्रशासनाने सांगावे. विभागीय आयुक्त डॉ.दांगट म्हणाले, २ वर्षांपूर्वी शासनाने २ कोटी रुपये दिले होते. तेव्हा मनपाने आजवर त्या कामाला सुरुवात केली नाही. टंचाई असल्यामुळे गाळ काढण्यासाठी मनपाकडे आग्रह धरला. तलावाचे क्षेत्र ३०० हेक्टर आहे. या प्रकरणात मनपाला चौकशीचे आदेश दिले आहेत. आयुक्त बकोरिया म्हणाले, चौकशी करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी गाळ काढण्याचे कंत्राट का तपासले नाही. त्याच कंत्राटदाराला सध्या काम का दिले. तत्कालीन आयुक्तांनी निविदा तपासल्या नाहीत. विद्यमान आयुक्तांनी निविदा का तपासल्या नाहीत.४दोन वर्षांपूर्वीचा व्यवहार कायदेशीररीत्या योग्य आहे की नाही हे आयुक्तांना का तपासावे वाटले नाही. दोन्ही आयुक्तांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, असे माझे मत आहे. दांगट यांनी चौकशी करावी, असे आदेश पालकमंत्री कदम यांनी दिले.‘मनपाने गाळ खाल्लाच’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून मनपा आणि विभागीय प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. सोमवारी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ.सुभाष झांबड, आ.संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे यांनी लोकमतच्या वृत्तावरून मनपा आणि विभागीय प्रशासनाची झाडाझडती घेतली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देऊन गाळात कोणकोण अडकले आहेत, याचा अहवाल देण्यास सांगितले.