शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अखर्चित निधीबाबत जि.प.मध्ये चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:07 IST

जलसंधारणाच्या कामांसाठी प्राप्त झालेला ७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जलसंधारणाच्या कामांसाठी प्राप्त झालेला ७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. सदरील अखर्चित निधी शासनाकडे परत करण्याऐवजी जिल्हा परिषदेने तो ३१ मार्च रोजीच लघुपाटबंधारे विभागाकडे वर्ग केला. निधी वर्ग करण्याची संपूर्ण कार्यवाही ही बनावट इतिवृत्ताद्वारे करण्यात आल्याचा आरोप होताच या प्रकरणाची विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली. तथापि, सध्या आयुक्त कार्यालयामार्फत यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे.दोन महिन्यांपूर्वी अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड यांंनी स्थायी समितीच्या बैठकीत ७ कोटी रुपयांच्या निधीवरून सभागृहाला धारेवर धरले होते. याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा, जि. प. सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पांढरे, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांच्यावर गैरव्यवहाराचेहीआरोप करण्यात आले होते. जि. प. जलसंधारण समितीच्या बैठकीत प्राप्त ७ कोटी रुपयांचा अखर्चित निधी लघु पाटबंधारे कार्यालयाकडे वर्ग करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला, असे बैठकीचे बनावट इतिवृत्त करण्यात आले.दरम्यान, मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा याच मुद्यावर सुरेश सोनवणे, विजय चव्हाण, एल. जी. गायकवाड, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, बांधकाम सभापती विलास भुमरे, जि. प. उपाध्यक्ष केशव तायडे आदींनी प्रशासनाला जाब विचारला. ७ कोटी रुपये अखर्चित राहिले, तर ते शासनाकडे परत करण्याची जबाबदारी सिंचन विभागाची होती. परंतु अखर्चित निधी शासनाकडे परत न करता तो परस्पर लघु पाटबंधारे विभागाकडे कोणत्या आधारे वर्ग केला. यासाठी सर्वसाधारण सभा, स्थायी समिती अथवा विषय समितीची पूर्व परवानगी का घेण्यात आली नाही, असा या सदस्य- पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जि. प. सिंचन विभागाने ३१ मार्च २०१७ रोजी सकाळी ३ कोटी रुपये व दुपारी १ कोटी रुपये, तर उर्वरित ३ कोटी १७ जून २०१७ रोजी लघु पाटबंधारे विभागाकडे वर्ग केला. यासंदर्भात तयार करण्यात आलेले जलसंधारण विभागाचे इतिवृत्त बनावट आहे, याची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह सदस्यांनी धरला.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी