शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

विधी विद्यापीठात २ वर्षांत पायाभूत सुविधा -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:39 IST

सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादला आगामी दोन वर्षांत जमिनीसह सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादला आगामी दोन वर्षांत जमिनीसह सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे होते. तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी, औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधि विद्यापीठाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे स्पष्ट केले. तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठे स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या तिन्ही विद्यापीठांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, इतर गोष्टी तत्परतेने उपलब्ध करून दिल्या आहेत.औरंगाबादच्या विधि विद्यापीठासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीणा कन्नडकर यांनी केले. आभार प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.आर. सी. कृष्णेय यांनी मानले. कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विक्रम काळे, संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ, माजी न्यायमूर्ती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कुलगुरू भोपाळला परतणार नाहीतविधि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी पदभार घेतल्यानंतर परत भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र न्यायमूर्ती बोर्डे यांनी यात हस्तक्षेप करून थांबण्यास भाग पाडल्याचे सांगितले.यावर मुख्यमंत्र्यांनी विधि विद्यापीठाला आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील, यामुळे तुम्हाला भोपाळला जावे वाटणारच नाही, असे स्पष्ट करताच टाळ्यांचा कडकडाट झाला....आता तरी वाट पाहायला लावू नका : बागडेऔरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू करण्यासाठी खूप वाट पाहिली आहे. आता निधी मिळण्यासाठीही वाट पाहायला लावू नका, असे आवाहन विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. विद्यापीठाला स्वत:ची जागा, इमारती, संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही बागडे यांनी सांगितले.१४८ कोटी रुपयांची आवश्यकता : न्यायमूर्ती बोर्डेमराठवाड्यात स्थापन झालेल्या विधि विद्यापीठाला ९ एकर जागा उपलब्ध झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार ५० एकर जागेची आवश्यकता आहे. तेव्हा राज्य सरकारने ‘वाल्मी’ संस्थेची ३० एकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेली काही जमीन उपलब्ध करून द्यावी, असे न्यायमूर्ती बोर्डे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या इमारती, वर्गखोल्या आदींसह एकूण १४८ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, तर न्या. ताहीलरामानी यांनी बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थित्यंतरामध्ये समाजातील सर्व घटकांना योग्य तो न्याय मिळवून देणारा कायदा हेच महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले.मानद प्राध्यापक म्हणून शिकवण्यात आनंदमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधि क्षेत्रातीलच असल्यामुळे विद्यापीठातर्फे त्यांना मानद प्राध्यापक म्हणून लेक्चर घेण्यास बोलावण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी ही आनंदाची बाब असून, यावेळी न्यायव्यवस्थेतील इतरही तज्ज्ञ असतील तर अधिक चांगले होईल, असेही सांगितले.