शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठात २ वर्षांत पायाभूत सुविधा -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:39 IST

सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादला आगामी दोन वर्षांत जमिनीसह सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादला आगामी दोन वर्षांत जमिनीसह सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे होते. तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी, औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधि विद्यापीठाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे स्पष्ट केले. तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठे स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या तिन्ही विद्यापीठांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, इतर गोष्टी तत्परतेने उपलब्ध करून दिल्या आहेत.औरंगाबादच्या विधि विद्यापीठासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीणा कन्नडकर यांनी केले. आभार प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.आर. सी. कृष्णेय यांनी मानले. कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विक्रम काळे, संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ, माजी न्यायमूर्ती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कुलगुरू भोपाळला परतणार नाहीतविधि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी पदभार घेतल्यानंतर परत भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र न्यायमूर्ती बोर्डे यांनी यात हस्तक्षेप करून थांबण्यास भाग पाडल्याचे सांगितले.यावर मुख्यमंत्र्यांनी विधि विद्यापीठाला आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील, यामुळे तुम्हाला भोपाळला जावे वाटणारच नाही, असे स्पष्ट करताच टाळ्यांचा कडकडाट झाला....आता तरी वाट पाहायला लावू नका : बागडेऔरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू करण्यासाठी खूप वाट पाहिली आहे. आता निधी मिळण्यासाठीही वाट पाहायला लावू नका, असे आवाहन विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. विद्यापीठाला स्वत:ची जागा, इमारती, संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही बागडे यांनी सांगितले.१४८ कोटी रुपयांची आवश्यकता : न्यायमूर्ती बोर्डेमराठवाड्यात स्थापन झालेल्या विधि विद्यापीठाला ९ एकर जागा उपलब्ध झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार ५० एकर जागेची आवश्यकता आहे. तेव्हा राज्य सरकारने ‘वाल्मी’ संस्थेची ३० एकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेली काही जमीन उपलब्ध करून द्यावी, असे न्यायमूर्ती बोर्डे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या इमारती, वर्गखोल्या आदींसह एकूण १४८ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, तर न्या. ताहीलरामानी यांनी बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थित्यंतरामध्ये समाजातील सर्व घटकांना योग्य तो न्याय मिळवून देणारा कायदा हेच महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले.मानद प्राध्यापक म्हणून शिकवण्यात आनंदमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधि क्षेत्रातीलच असल्यामुळे विद्यापीठातर्फे त्यांना मानद प्राध्यापक म्हणून लेक्चर घेण्यास बोलावण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी ही आनंदाची बाब असून, यावेळी न्यायव्यवस्थेतील इतरही तज्ज्ञ असतील तर अधिक चांगले होईल, असेही सांगितले.