शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत समाविष्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:21 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत समाविष्ट करू देण्याची अंतरिम मुभा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी दिली.

औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत समाविष्ट करू देण्याची अंतरिम मुभा मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी दिली.

अहमदनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह शिक्षणाधिकाºयांना नोटीस बजाविण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यावर एक आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले शिक्षक भाऊसाहेब जगताप व इतरांनी याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शिक्षकाची बदली तीन वर्षांत व्हावी, असे नमूद केले आहे. संबंधित याचिकाकर्त्यांची ३१ मे २०१७ रोजी अवघड क्षेत्रात बदली झाली होती. तालुका व जिल्हास्तरावर संबंधितांचे नाव बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत नव्हते. त्यांची सेवा अवघड क्षेत्रात २ वर्षे ११ महिने, अशी संगणकात दाखविली जात होती. प्रत्यक्षात त्यांनी अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण केली आहेत. यामुळे त्यांना संगणकावर बदलीसाठी पर्याय देता येत नव्हता. संगणक त्यांचे नाव स्वीकारत नव्हते. याविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

आपले नाव संगणक प्रणालीद्वारे समाविष्ट करून घेण्यात यावे. आपण बदलीस पात्र आहोत, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. खंडपीठाने संबंधितांना संगणकात माहिती दाखल करू देण्याची अंतरिम मुभा दिली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रामेश्वर तोतला, अ‍ॅड. राहुल तोतला, अ‍ॅड. रामानंद करवा आणि अ‍ॅड. बी.एम. काटे यांनी काम पाहिले. राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय