शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

यादीतून वगळलेल्या ‘त्या’ ९७५ धार्मिक स्थळांची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:26 IST

अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खाजगी जागेवरील ९७५ धार्मिक स्थळांची आणि त्यांच्या मालकांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी महापालिकेला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खाजगी जागेवरील ९७५ धार्मिक स्थळांची आणि त्यांच्या मालकांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी महापालिकेला दिले.तसेच एका हस्तक्षेप अर्जाच्या अनुषंगाने सिडकोला प्रतिवादी करण्याचे तसेच त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश खंडपीठानेदिले. याचिकेची पुढील सुनावणीदोन आठवड्यांनंतर होणारआहे.शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत केलेल्या कारवाईसंदर्भात मनपाने आजच्या सुनावणीच्या वेळी उत्तर दाखल केले. १० आॅक्टोबर २०१७ रोजी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती मागविण्यात आल्या. यासाठी पोलीस, मनपा आणि महसूल विभागाच्या अधिकाºयांची सहा पथके तयार करण्यात आली. त्यांनी शहरात फिरून यादी तयार केली. दरम्यान मनपाला प्राप्त झालेल्या ९८३ नवीन हरकतींपैकी ६४६ धार्मिक स्थळांबाबतच्या होत्या. ६४४६ पैकी ६०३ धार्मिक स्थळे खाजगी जागांवर असल्याचा अहवाल पथकांनी दिला. उर्वरित ४३ धार्मिक स्थळे सार्वजनिक व खाजगी जागेवर आहेत. ४३ पैकी २८ धार्मिक स्थळे ‘अ’ गटात (नियमित करण्यासारखी) आहेत, तर ५ ‘ब’ गटात ( हटविण्यासारखी) असे सुचविले.एकूण १०५६ पैकी ९७५ धार्मिक स्थळे खाजगी जागेवर असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी ७३ धार्मिक स्थळे शासकीय व सार्वजनिक जागेवर असल्याचे आढळले. उच्च न्यायालयाने त्यावेळी दिलेला निर्णय आणि ५ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक व शासकीय जागेवरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश मनपाने दिले होते. त्यामुळे ९७५ धार्मिक स्थळांना कारवाईतून वगळण्याचा निर्णय मनपाने घेतला. तसेच ७३ धार्मिक स्थळे नियमित करण्याचा, ७ धार्मिक स्थळे हटविण्याचा आणि एक स्थलांतरित करण्याचा निर्णय समितीनेघेतला.भाजीमंडई रोड येथील हनुमान मंदिर, जागृत महादेव मंदिर, अस्थाना, केळीबाजार रस्ता, शनी मंदिर खाराकुवा, कदीम मशीद, क्रांतीचौक, हनुमान मंदिर एन-७ आणि बौद्ध विहार, संघर्षनगर ही ७ धार्मिक स्थळे हटविण्याचे ठरविले. त्यापैकी ४ धार्मिक स्थळे १९६० सालापूर्वीची असल्याने शासनाची परवानगी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव २ नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप काहीही उत्तर मिळाले नाही. इतर ३ धार्मिक स्थळांवर कारवाई झाली आहे.