शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महागाईत सेवाकराचा ‘भडका’

By admin | Updated: May 25, 2016 00:02 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद पाणी, वीज, मोबाईल बिल असो की विमा पॉलिसी; प्रवास भाडे किंवा हॉटेलमध्ये जेवण; जिथे जिथे ग्राहकांना सेवा दिली जाते, त्या सर्व सेवा १ जूनपासून महागणार आहेत.

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादपाणी, वीज, मोबाईल बिल असो की विमा पॉलिसी; प्रवास भाडे किंवा हॉटेलमध्ये जेवण; जिथे जिथे ग्राहकांना सेवा दिली जाते, त्या सर्व सेवा १ जूनपासून महागणार आहेत. कारण, केंद्र सरकारने सेवाकरात (सर्व्हिस टॅक्स) मध्ये ०.५ टक्के कृषी कल्याण सेवा उपकर अर्थात सेस अतिरिक्त आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सेवाकर १५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आधीच महागाईत होरपळलेल्या जनतेला आता सेवाकर वाढीचा दणका बसणार आहे. यामुळे सेवा घेण्यासाठी नागरिकांना आपला खिसा आणखी सैल करावा लागणार आहे. सेवाकरात वाढ झाल्यामुळे पुढील आठवड्यात पाणी, वीज, मोबाईल, टेलिफोन बिल जादा आले तर आश्चर्य वाटायला नको. सध्या सेवाकर १४.५ टक्के आहे. १ जूनपासून प्रत्येक सेवा घेण्यासाठी ०.५ टक्के अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. वरकरणी ही दरवाढ कमी दिसत असली तरी कौटुंबिक बजेटमधील सर्वच सेवांना ही दरवाढ सोसावी लागणार असल्याने कौटुंबिक बजेटवर काही टक्क्यांनी भुर्दंड पडणार आहे. २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ जून २०१६ पासून कृषी कल्याण उपकर आकारणी करण्याची घोषणा केली होती. हा अतिरिक्त महसूल कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सेंट्रल एक्साईज विभागाने तयारी पूर्ण केली आहे. सेवा उद्योगानेही १ जूनपासून बिलामध्ये १५ टक्के सेवाकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक सेवा घेत असतो त्या सर्व सेवांवर उपकर लागणार आहे. विमा-बँकिंग सेवा महागणार, मोबाईल, फोनसेवा महागणार, पर्यटन, हॉटेलिंग, पार्लर सेवा महागणार, विवाहाच्या बजेटमध्ये वाढ होणार, मनोरंजनही महागणार आहे. याची अंमलबजावणी ६ दिवसांनंतर सुरू होणार आहे.