शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

महागाईत सेवाकराचा ‘भडका’

By admin | Updated: May 25, 2016 00:02 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद पाणी, वीज, मोबाईल बिल असो की विमा पॉलिसी; प्रवास भाडे किंवा हॉटेलमध्ये जेवण; जिथे जिथे ग्राहकांना सेवा दिली जाते, त्या सर्व सेवा १ जूनपासून महागणार आहेत.

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादपाणी, वीज, मोबाईल बिल असो की विमा पॉलिसी; प्रवास भाडे किंवा हॉटेलमध्ये जेवण; जिथे जिथे ग्राहकांना सेवा दिली जाते, त्या सर्व सेवा १ जूनपासून महागणार आहेत. कारण, केंद्र सरकारने सेवाकरात (सर्व्हिस टॅक्स) मध्ये ०.५ टक्के कृषी कल्याण सेवा उपकर अर्थात सेस अतिरिक्त आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सेवाकर १५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आधीच महागाईत होरपळलेल्या जनतेला आता सेवाकर वाढीचा दणका बसणार आहे. यामुळे सेवा घेण्यासाठी नागरिकांना आपला खिसा आणखी सैल करावा लागणार आहे. सेवाकरात वाढ झाल्यामुळे पुढील आठवड्यात पाणी, वीज, मोबाईल, टेलिफोन बिल जादा आले तर आश्चर्य वाटायला नको. सध्या सेवाकर १४.५ टक्के आहे. १ जूनपासून प्रत्येक सेवा घेण्यासाठी ०.५ टक्के अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. वरकरणी ही दरवाढ कमी दिसत असली तरी कौटुंबिक बजेटमधील सर्वच सेवांना ही दरवाढ सोसावी लागणार असल्याने कौटुंबिक बजेटवर काही टक्क्यांनी भुर्दंड पडणार आहे. २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ जून २०१६ पासून कृषी कल्याण उपकर आकारणी करण्याची घोषणा केली होती. हा अतिरिक्त महसूल कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सेंट्रल एक्साईज विभागाने तयारी पूर्ण केली आहे. सेवा उद्योगानेही १ जूनपासून बिलामध्ये १५ टक्के सेवाकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक सेवा घेत असतो त्या सर्व सेवांवर उपकर लागणार आहे. विमा-बँकिंग सेवा महागणार, मोबाईल, फोनसेवा महागणार, पर्यटन, हॉटेलिंग, पार्लर सेवा महागणार, विवाहाच्या बजेटमध्ये वाढ होणार, मनोरंजनही महागणार आहे. याची अंमलबजावणी ६ दिवसांनंतर सुरू होणार आहे.