शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गावांत दूषित पाणी; आरोग्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:28 IST

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील ४९५ ठिकाणच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील तब्बल ९४ गावातील पाणी नमुने अतिदुषित, तर ११० ठिकाणचे पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड :जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील ४९५ ठिकाणच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील तब्बल ९४ गावातील पाणी नमुने अतिदुषित, तर ११० ठिकाणचे पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे.पावसाळ्यात जलजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणच्या सार्वजनिक जलस्त्रोतातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील ४९५ ठिकाणच्या जलस्त्रोतांच्या पाण्याचे नमुने यावेळी घेण्यात आले. यानंतर सदर पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील तब्बल ११० ठिकाणचे पाणी नमुने म्हणजेच तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी २२ टक्के नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. दूषित ११० नमुन्यांपैकी ९४ ठिकाणचे पाणी अतिदूषित असल्याचेही अहवालात नमूद आहे. यातही बीड व गेवराई तालुक्यातील पाणी नमुने जास्त प्रमाणात दुषीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तालुक्यांमधील गावे नदी पात्रालगत असल्याने तेथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही नदीलगत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणचे पाणी नमुने जास्त प्रमाणात दुषीत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे.