शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र शिक्षकांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:17 IST

खाजगी इंग्रजी शाळांमधून अकुशल शिक्षकांचा सुळसुळाट झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. बी. एड., डी. एड. असे औपचारिक पद्धतीचे शिक्षण न घेतलेली ही बनावट शिक्षक मंडळी कमी पगारात काम करीत असल्यामुळे संस्थाचालकांचेही चांगलेच फावते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणत्याही क्षेत्रातील पदवी आणि उत्तम इंग्रजी येत असेल तर खाजगी इंग्रजी शाळांमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून सहज रुजू होऊ शकता. अशा प्रकारचा सध्याचा ‘ट्रेंड’ झाल्यामुळे खाजगी इंग्रजी शाळांमधून अकुशल शिक्षकांचा सुळसुळाट झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. बी. एड., डी. एड. असे औपचारिक पद्धतीचे शिक्षण न घेतलेली ही बनावट शिक्षक मंडळी कमी पगारात काम करीत असल्यामुळे संस्थाचालकांचेही चांगलेच फावते आहे.आजघडीला शहरातील खाजगी इंग्रजी शाळांची पाहणी केली असता, बहुसंख्य शाळांमध्ये सदर प्रकार दिसून आला. ही शिक्षक मंडळी अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम तर करतात, पण या शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या बाबतीत कोणताही अभ्यास नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात हे शिक्षक निश्चितच कमी पडत आहेत. या गोष्टीचे दुष्परिणाम पुढील १० ते १५ वर्षांत दिसून येतील, असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.याविषयी सांगताना बी. एड. महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद सांगतात की, बी. एड. किंवा डी. एड. अभ्यासक्रमात भावी शिक्षकांना अध्यापन पद्धती म्हणजेच एखादा विषय शिकविण्याचे कौशल्य ते मुलांचे मानसशास्त्र इथपर्यंत सगळेच शिकविले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मुद्दाच केंद्रस्थानी ठेवून या शाखांचा अभ्यासक्रम तयार केलेला असतो.मुलांची मानसिकता कशी ओळखायची, मुलांना विषयात गुंतवून कसे ठेवायचे, एखाद्या कठीण प्रश्नाची उकल मुलांच्या मानसिकतेतून कशी करायची हे सगळे विषय बी. एड., डी. एड. अभ्यासक्रमातून शिकविले जातात.बी. एड., डी. एड.दरम्यान पुस्तकी अभ्यासासोबतच भावी शिक्षकांना अनिवार्य असणारा छात्र सेवाकाळही पूर्ण करावा लागतो. यामध्ये शिकविण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.याशिवाय या अभ्यासक्रमांमध्ये मुलांचे सुप्तगुण ओळखून त्यांचा विकास करण्याचे प्रशिक्षणही मिळते. त्यामुळे असे कोणतेही प्रशिक्षण न घेता शिक्षक म्हणून रुजू झालेल्यांकडे देशाची भावी पिढी सोपवणे हे दुर्दैव असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.