शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

उद्योगांना उभारी मिळायला हवी

By admin | Updated: July 4, 2014 01:10 IST

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात मागील काही वर्षांपासून मंदीचे वातावरण पसरले आहे

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात मागील काही वर्षांपासून मंदीचे वातावरण पसरले आहे. यातून उभारी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, मध्यम व सूक्ष्म उद्योगांनाही निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे, जीएसटी करप्रणाली देशात एकाच वेळी लागू करावी, पायाभूत सुविधेतील अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यात यावेत, यातून रोजगारही मोठ्या प्रमाणात वाढेल, अशा आशा आगामी अर्थसंकल्पाकडून उद्योजकांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांनी सांगितले की, नवीन केंद्र शासनाकडून उद्योग व व्यापार क्षेत्राला मोठी अपेक्षा आहे. नुकतीच एक्साईज ड्यूटीतील सवलत डिसेंबर महिन्यापर्यंत वाढवून आॅटो इंडस्ट्रीजला सरकारने मोठा दिलास दिला आहे. यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पातही उद्योगांच्या वाढीसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी आशा निर्माण झाली आहे. अर्थमंत्र्यांनी इन्कमटॅक्समध्ये सवलत द्यावी, याशिवाय दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत खरेदीतही सवलत द्यावी.सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सांगितले की, मंदीच्या छायेत असणाऱ्या उद्योगांना नवीन उभारी देणारा अर्थसंकल्प असावा. उद्योगांना सबसिडीपेक्षा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने टाईमलिमिट ठरवून प्रकल्प पूर्ण करावेत. तसेच निर्यातीसाठी मध्यम व लघु उद्योगांना सरकारने प्रोत्साहन दिल्यास निर्यात वाढेल, तसेच रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे म्हणाले की, जीएसटी करप्रणाली देशात लागू करण्यात यावी. उद्योगांना मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी करण्यात यावेत. बहुपर्यायी कर रद्द करण्यात यावेत.कामगार कायद्यातही सुसूत्रता आणावी. उद्योजक उमेश दाशरथी यांनी सांगितले की, उद्योग व शेतीला मध्यबिंदू मानून अर्थसंकल्प मांडण्यात यावा. कारण, मागील काही वर्षांत या दोन्ही क्षेत्रांची मोठी उपेक्षा झाली आहे.उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी करप्रणालीत पारदर्शकता आणावी, एक खिडकी योजना सुरूकरावी. उद्योजक विवेक देशपांडे यांनी आशा व्यक्त केली की, नवीन केंद्र सरकार उद्योगवाढीसाठी अर्थसंकल्पात सकारात्मक तरतुदी करील. जीएसटीची अंमलबजावणी संपूर्ण देशात केल्यास, संपूर्ण देशात उत्पादनाच्या किमती सारख्या राहतील. कराची वसुली सन्मानाने व्हावी, यासाठी प्रयत्न केलेजावेत. काय हवे?‘जीएसटी’ लागू करावाउद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न व्हावेत.कमी दरात कर्ज मिळावे.सरकारने आयात- निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.डीएमआयसीचे वेळापत्रक जाहीर करावे.धोरणात्मकनिर्णयाकडे लक्ष नवीन केंद्र सरकारची आर्थिक नीती कशी असेल, हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.परकीय गुंतवणुकीसंदर्भात सरकार कोणते धोरणात्मक निर्णय घेते, मंदीतून उद्योगांना सावरण्यासाठी काय तरतूद करण्यात येते.उद्योगाकडे पाहण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा कसा दृष्टिकोन आहे, याबद्दल उद्योजकांमध्ये उत्सुकता आहे.सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेईल, अशी उद्योग वर्तूळात अपेक्षा आहे.