शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराला हवाय इंदौर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. ...

ठळक मुद्देडोअर टू डोअर कलेक्शन हवे : ठिकठिकाणी कच-यावर यशस्वी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. इंदौर महापालिकेतर्फे प्रत्येक घरातून, दुकानातून दोन वेळा कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे, ठिकठिकाणी प्रक्रियाही यशस्वीपणे करण्यात येते. याच इंदौर पॅटर्नची औरंगाबाद शहराला आज नितांत गरज आहे. जोपर्यंत महापालिका स्वत: या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करीत नाही, तोपर्यंत शहरातील कचºयाचा प्रश्न सुटणार नाही, हे निश्चित.मध्यप्रदेशच्या इंदौर शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. येथील कचºयाचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. डोअर टू डोअर कलेक्शन करताना ओला व सुका कचºयाचे शंभर टक्के वर्गीकरण करण्यात येते.३५० रिक्षांवर सकाळी आणि सायंकाळी दोन वेगवेगळी गाणी वाजविण्यात येतात. हे गाणे ऐकून प्रत्येक घरातील महिला, आबालवृद्ध कचरा आणून टाकतात. जमा झालेला कचरा नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेने उभारली आहे. प्रक्रिया केंद्रावर हा कचरा नेऊन शंभर टक्के प्रक्रियाही करण्यात येते. रस्त्यावर, चौकात, दुभाजकात कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंडही आकारण्यात येतो.कचराकुंडी ही संकल्पनाच महापालिकेने ठेवलेली नाही. व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी दोन वेळा कचरा उचलण्यात येत असल्याने नागरिकही आनंदी आहेत. शहरात कुठेच घाण, कचरा दिसून येत नाही. मागील सहा महिन्यांपासून महापालिकेला कचरा प्रश्न भेडसावत आहे. आता हा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला असून, २३ दिवसांपासून शहरात १० हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.शेकडो प्रयत्न केले तरी महापालिकेला कचरा उचलण्यात यश आलेले नाही. आणखी काही दिवसांमध्ये कचरा उचलण्याची कोणतीही शाश्वती नाही. चार दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांमध्ये संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा दावा सर्वसाधारण सभेत केला. हा दावा आतापर्यंतच्या अनेक दाव्यांप्रमाणे फोल ठरला.जनजागृतीचा प्रचंड अभाववर्षानुवर्षे नागरिकांना पडलेल्या सवयीनुसार आजही विविध चौकांमध्ये गल्लीतील कोपºयावर, सोसायटीच्या बाहेर कचरा आणून टाकण्यात येतो. ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय असंख्य नागरिकांना नाही. नागरिकांमध्ये अगोदर जनजागृती करण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे.शहरात साडेतीन लाख मालमत्ताऔरंगाबाद मनपा हद्दीत किमान साडेतीन ते चार लाख मालमत्ता असतील, असा अंदाज आहे. प्रत्येक घरातून कचरा उचलणे म्हणजे मनपासाठी इंद्रधनुष्य उचलण्यासारखाच प्रकार आहे. मनपाकडे सध्या तरी यासंदर्भात कोणतीच तयारी नाही. काही चांगले करण्याची इच्छाशक्तीही नाही.