शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

औरंगाबाद शहराला हवाय इंदौर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. ...

ठळक मुद्देडोअर टू डोअर कलेक्शन हवे : ठिकठिकाणी कच-यावर यशस्वी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. इंदौर महापालिकेतर्फे प्रत्येक घरातून, दुकानातून दोन वेळा कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे, ठिकठिकाणी प्रक्रियाही यशस्वीपणे करण्यात येते. याच इंदौर पॅटर्नची औरंगाबाद शहराला आज नितांत गरज आहे. जोपर्यंत महापालिका स्वत: या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करीत नाही, तोपर्यंत शहरातील कचºयाचा प्रश्न सुटणार नाही, हे निश्चित.मध्यप्रदेशच्या इंदौर शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. येथील कचºयाचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. डोअर टू डोअर कलेक्शन करताना ओला व सुका कचºयाचे शंभर टक्के वर्गीकरण करण्यात येते.३५० रिक्षांवर सकाळी आणि सायंकाळी दोन वेगवेगळी गाणी वाजविण्यात येतात. हे गाणे ऐकून प्रत्येक घरातील महिला, आबालवृद्ध कचरा आणून टाकतात. जमा झालेला कचरा नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेने उभारली आहे. प्रक्रिया केंद्रावर हा कचरा नेऊन शंभर टक्के प्रक्रियाही करण्यात येते. रस्त्यावर, चौकात, दुभाजकात कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंडही आकारण्यात येतो.कचराकुंडी ही संकल्पनाच महापालिकेने ठेवलेली नाही. व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी दोन वेळा कचरा उचलण्यात येत असल्याने नागरिकही आनंदी आहेत. शहरात कुठेच घाण, कचरा दिसून येत नाही. मागील सहा महिन्यांपासून महापालिकेला कचरा प्रश्न भेडसावत आहे. आता हा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला असून, २३ दिवसांपासून शहरात १० हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.शेकडो प्रयत्न केले तरी महापालिकेला कचरा उचलण्यात यश आलेले नाही. आणखी काही दिवसांमध्ये कचरा उचलण्याची कोणतीही शाश्वती नाही. चार दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांमध्ये संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा दावा सर्वसाधारण सभेत केला. हा दावा आतापर्यंतच्या अनेक दाव्यांप्रमाणे फोल ठरला.जनजागृतीचा प्रचंड अभाववर्षानुवर्षे नागरिकांना पडलेल्या सवयीनुसार आजही विविध चौकांमध्ये गल्लीतील कोपºयावर, सोसायटीच्या बाहेर कचरा आणून टाकण्यात येतो. ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय असंख्य नागरिकांना नाही. नागरिकांमध्ये अगोदर जनजागृती करण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे.शहरात साडेतीन लाख मालमत्ताऔरंगाबाद मनपा हद्दीत किमान साडेतीन ते चार लाख मालमत्ता असतील, असा अंदाज आहे. प्रत्येक घरातून कचरा उचलणे म्हणजे मनपासाठी इंद्रधनुष्य उचलण्यासारखाच प्रकार आहे. मनपाकडे सध्या तरी यासंदर्भात कोणतीच तयारी नाही. काही चांगले करण्याची इच्छाशक्तीही नाही.