शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक व्हावी

By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST

दाभोलकरांचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजण्यासाठी स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ़ बाबा आढाव यांनी केले़

नांदेड : राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार प्रदान केलेत़ डॉ़ नरेंद्र दाभोलकर हे घटनेच्या बाहेर जावून काम करत नव्हते़ समाजविघातक सनातनी वृत्तीकडून त्यांचा खून झाला़ दाभोलकरांचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजण्यासाठी स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ़ बाबा आढाव यांनी केले़ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ़ व्यंकटेश रुख्माजी काब्दे यांना पहिल्या डॉ़ नरेंद्र दाभोलकर विवेकभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ़ बाबा आढावा यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले़ कुसूम सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील होते़ मंचावर अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, डॉ़ हंसराज वैद्य, डॉ़ लक्ष्मण शिंदे, गुणवंत पाटील हंगरगेकर, हनुमंत पवार, डॉ. किरण चिद्रावार, डॉ़ कुंजम्मा काब्दे यांची उपस्थिती होती़ मार्गदर्शनपर भाषणात डॉ़ बाबा आढाव यांनी सनातनी वृत्तीवर कडाडून टीका केली़ डॉ़ दाभोलकर यांची हत्या होवून वर्षभराचा कालावधी लोटला़ मारेकरी कोण होते, यापेक्षा या कृत्यामागे कोणाचा हात होता हे शोधणे महत्त्वाचे आहे़ मात्र या प्रकरणाचा तपास लावण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे़ जगातील दहशतवाद संपवण्याची भाषा केली जात आहे़ गल्ली बोळातील दहशतवाद संपवण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा जगातील दहशतवाद कसा संपवणार असा प्रश्न आढाव यांनी उपस्थित केला़ भारताचे संविधान स्वातंत्र्य, समता, बंधूता, विज्ञानभेद, समाजवाद मुल्यांवर आधारीत आहे़ याची अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे़ सर्वांना समानतेने स्वतंत्र विचारानिशी जगण्याचा अधिकार आहे़ असे असताना परिवर्तनवादी विचार संपवण्याच्या उद्देशाने दाभोलकर यांचा खून करण्यात आला़ हे कृत्य घटनेला अनुसरुन नाही़ स्वातंत्र्यमुल्य कितपत रुजलीत हे यावरुन स्पष्ट होते़ समाजाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी जात-पात, अन्य भेदभाव बाजूला सारुन चांगल्या मुल्यांची रुजवण होणे गरजचे असल्याचे बाबा आढाव यांनी सांगीतले़ अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजाला जागृत करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगीतले़ परीवर्तनवादी विचारसरणीची माणसं दाभोलकरांनी जोडली़ कोणताही बदल घडवण्याची ताकद तरुणांच्या हाती आहे़ नेमकी हीच बाब ओळखून अंनिस चळवळीची धुरा दाभोलकरांनी तरुणांच्या हाती सोपविली़ त्यामुळेच ही चळवळ प्रभावी ठरत आहे़ डॉ़ व्यंकटेश काब्दे म्हणाले, समाजसुधारक, विचारप्रवर्तकांची मोठी परंपरा देशाला लाभली आहे़ आपल्या जीवनांवर सभोवतालच्या अनेक गोष्टींचा पगडा असल्याचे जाणवते़ श्रद्धा असावी मात्र ती अंधश्रद्धा बनू नये यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे़ दाभोलकरांच्या नावाने झालेला सन्मान सर्व समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगीतले़ सदाशीवराव पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला़ प्रकाश पाईकराव यांनी वैज्ञानिक प्रात्यक्षिक करुन दाखविले़ यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)