शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

सायबर क्राईमचे हवे स्वतंत्र पोलीस ठाणे

By admin | Updated: January 24, 2017 22:36 IST

लातूर तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

राजकुमार जोंधळे लातूरतंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या गुन्ह्यांच्या तपास कामासाठी जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम सेलला आता पाठबळ देण्यात आले आहे. भविष्यात महावितरणच्या धर्तीवर या ठाण्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रायोगिक तत्त्वावर म्हणून सायबर सेल अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न गृहविभागाकडून सुरू आहेत. लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत जवळपास १ हजार १५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील ७५ टक्क्यांच्या आसपास गुन्ह्यांचा सायबर लॅबच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उलगडा झाला आहे. भविष्यातील सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन राज्याच्या गृहविभागाने त्या-त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एकाच दिवशी राज्यात सायबर सेल या विभागाचे नूतनीकरण आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या सायबर क्राईम अंतर्गत तक्रारींचा उलगडा होण्यासाठी सायबर सेलची मदत घ्यावी लागते. सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून होणारे सायबर क्राईम रोखण्यासाठी आता जिल्हास्तरावर स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे. त्यानुषंगाने या सायबर लॅबचे नूतनीकरण करण्यात आले आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन आॅगस्ट २०१६ मध्ये पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सायबर लॅबमुळे सध्याला अत्याधुनिक यंत्रणा आणि त्यासाठी लागणारी अत्याधुनिक व्हॅन पोलीस दलात दाखल झाली आहे. गंभीर गुन्हा घडल्यानंतर तातडीने ही व्हॅन घटनास्थळी दाखल होते. त्यामुळे पुरावे आणि त्याबाबतचे बारकावे टिपण्यासाठी व्हॅनचा वापर केला जात आहे. शिवाय, गुन्हेगारांचे लोकेशन शोधण्यासाठी या लॅबचा उपयोग होत आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सायबर लॅबमधील यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.