शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

वाहनवाढीने आरटीओ कार्यालय मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:51 IST

वाहनांच्या वाढत्या संख्येने आरटीओ कार्यालय मालामाल होत आहे, औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीडमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीत १५.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अवघ्या ९ महिन्यांत २३६ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तब्बल १२२ टक्के महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कार्यालयाने पूर्ण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाहनांच्या वाढत्या संख्येने आरटीओ कार्यालय मालामाल होत आहे, औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीडमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीत १५.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अवघ्या ९ महिन्यांत २३६ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तब्बल १२२ टक्के महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कार्यालयाने पूर्ण केले आहे.औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ७६ हजार ८७३ वाहनांची नोंद झाली.गतवर्षीच्या तुलनेत दर महिन्याला १ हजार ४० वाहनांची अधिक नोंदणी होत आहे. परिणामी महसुलामध्येही चांगलीच वाढ होत आहे. या तीन जिल्ह्यांतील वाहनांची संख्या १८ लाख ६२ हजार ९०८ वर पोहोचली आहे, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाख ६० हजार ७९२ इतकी आहे.तीन जिल्हे मिळून २०१७-१८ या आर्थिक वर्षात २६९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये डिसेंबरपर्यंत १९९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु यापेक्षा अधिक महसूल गोळा करण्याचा विक्रम विभागाने केला आहे. १२२ टक्के महसूल वसूल झाला आहे.विशिष्ट नंबरला पसंतीमागील वर्षी ४ हजार ६५१ पसंती क्रमांकातून (चॉईस नंबर) ३ कोटी ६७ लाख रुपये प्राप्त झाले, तर २०१७ मध्ये ४ हजार १८० पसंती क्रमांक गेले. यातून ३ कोटी ४४ लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला, तर दंडाच्या माध्यमातून ५० कोटी २ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.उद्दिष्ट पूर्ण४वाहन नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. जवळपास १५.३० टक्के वाढ आहे. आरटीओ कार्यालय आणि विभाग दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा करीत आहे, ही चांगली बाब आहे. मराठवाड्यातील हा विभाग उद्दिष्ट पूर्ण करण्यात सर्वात पुढे आहे.-सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी