शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर

By admin | Updated: April 6, 2016 00:47 IST

जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील

जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील तर बहार घेणे टाळण्यासोबतच झाडांना लागलेली फळे काढून टाकण्याचे आवाहन तज्ज्ञ करीत आहेत. एकूणच वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर आले आहे.जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीचे क्षेत्र आहे. त्यात जालना, बदनापूर व अंबड तालुक्यांत हे क्षेत्र जास्त आहे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही मोसंबी लागवडीकडे कल वाढत आहे. मात्र वाढती पाणीटंचाई व वाढलेले तापमान यामुळे मोसंबी बागा धोक्यात येत आहेत. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही. फेब्रुवारी महिन्यातच विहिरी तसेच कूपनलिकांनी तळ गाठला. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी बहर घेणे सुरूच ठेवले आहे. कडक उन्हामुळे व पाणीटंचाई पाहता बहर नष्ट होण्यासोबतच बागाही धोक्यात येण्याची स्थिती आहे. बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील फळ अधिकारी एम.बी. पाटील म्हणाले, तापमान ४० अंशांवर जात आहे. यामुळे मोसंबीसह सर्वच पिकांना धोका निर्माण झाला आहे. जर मोसंबी बाग टिकवायचे असतील तर शेतकऱ्यांनी बहर घेऊ नये तसेच झाडाला लागलेली फळ काढून टाकावीत. जेणे करून पाणी कमी लागेल. झाडे जगतील. थोडक्यात शेतकऱ्यांनी फळांचा मोह टाळण्याचे आवाहन पाटील यांनी केले. झाडे जगविण्यासाठी आच्छादन करणे गरजेचे आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पाने कमी करावीत. आहे त्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. फळबागांना ठिबकने रात्रीच पाणीपुरवठा करावा. (प्रतिनिधी)