शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर

By admin | Updated: April 6, 2016 00:47 IST

जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील

जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील तर बहार घेणे टाळण्यासोबतच झाडांना लागलेली फळे काढून टाकण्याचे आवाहन तज्ज्ञ करीत आहेत. एकूणच वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर आले आहे.जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीचे क्षेत्र आहे. त्यात जालना, बदनापूर व अंबड तालुक्यांत हे क्षेत्र जास्त आहे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही मोसंबी लागवडीकडे कल वाढत आहे. मात्र वाढती पाणीटंचाई व वाढलेले तापमान यामुळे मोसंबी बागा धोक्यात येत आहेत. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही. फेब्रुवारी महिन्यातच विहिरी तसेच कूपनलिकांनी तळ गाठला. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी बहर घेणे सुरूच ठेवले आहे. कडक उन्हामुळे व पाणीटंचाई पाहता बहर नष्ट होण्यासोबतच बागाही धोक्यात येण्याची स्थिती आहे. बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील फळ अधिकारी एम.बी. पाटील म्हणाले, तापमान ४० अंशांवर जात आहे. यामुळे मोसंबीसह सर्वच पिकांना धोका निर्माण झाला आहे. जर मोसंबी बाग टिकवायचे असतील तर शेतकऱ्यांनी बहर घेऊ नये तसेच झाडाला लागलेली फळ काढून टाकावीत. जेणे करून पाणी कमी लागेल. झाडे जगतील. थोडक्यात शेतकऱ्यांनी फळांचा मोह टाळण्याचे आवाहन पाटील यांनी केले. झाडे जगविण्यासाठी आच्छादन करणे गरजेचे आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पाने कमी करावीत. आहे त्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. फळबागांना ठिबकने रात्रीच पाणीपुरवठा करावा. (प्रतिनिधी)