शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर

By admin | Updated: April 6, 2016 00:47 IST

जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील

जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील तर बहार घेणे टाळण्यासोबतच झाडांना लागलेली फळे काढून टाकण्याचे आवाहन तज्ज्ञ करीत आहेत. एकूणच वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर आले आहे.जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीचे क्षेत्र आहे. त्यात जालना, बदनापूर व अंबड तालुक्यांत हे क्षेत्र जास्त आहे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही मोसंबी लागवडीकडे कल वाढत आहे. मात्र वाढती पाणीटंचाई व वाढलेले तापमान यामुळे मोसंबी बागा धोक्यात येत आहेत. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही. फेब्रुवारी महिन्यातच विहिरी तसेच कूपनलिकांनी तळ गाठला. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी बहर घेणे सुरूच ठेवले आहे. कडक उन्हामुळे व पाणीटंचाई पाहता बहर नष्ट होण्यासोबतच बागाही धोक्यात येण्याची स्थिती आहे. बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील फळ अधिकारी एम.बी. पाटील म्हणाले, तापमान ४० अंशांवर जात आहे. यामुळे मोसंबीसह सर्वच पिकांना धोका निर्माण झाला आहे. जर मोसंबी बाग टिकवायचे असतील तर शेतकऱ्यांनी बहर घेऊ नये तसेच झाडाला लागलेली फळ काढून टाकावीत. जेणे करून पाणी कमी लागेल. झाडे जगतील. थोडक्यात शेतकऱ्यांनी फळांचा मोह टाळण्याचे आवाहन पाटील यांनी केले. झाडे जगविण्यासाठी आच्छादन करणे गरजेचे आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पाने कमी करावीत. आहे त्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. फळबागांना ठिबकने रात्रीच पाणीपुरवठा करावा. (प्रतिनिधी)