शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

गुणवत्तेचा वाढता आलेख

By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST

संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़

 संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़ मागील पाच वर्षांत जिल्ह्याच्या गुणवत्तेचा आलेख चढताच राहिला आहे़ यावर्षीही बीडने ९२़३६ टक्के गुणांसह विभागात आपले वर्चस्व निर्माण केले आहे़ बीड जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी म्हटले की, अनेकजण नाक मुरडतात़ कॉप्यांच्या सुळसुळाटाने गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; परंतु बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आता ही ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुषंगाने कॉपीमुक्तीचा नाराही सातत्याने घुमत आहे़ सामाजिक संस्था, शिक्षण विभागाने कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न केले़ त्याचा च परिणाम म्हणून आता बीड जिल्ह्यातील विद्यार्थी स्वत:ची गुणवत्ता प्रामाणिकपणे सिद्ध करण्यासाठी सरसावू लागले आहेत़ मागील पाच वर्षांतील गुणवत्तेवर प्रकाशझोत टाकल्यावर हे स्पष्ट होते की, आता बीडचे विद्यार्थीही मागे राहिले नाहीत़ २०१० मध्ये जिथे जिल्ह्याचा एकूण निकाल ७१़७४ टक्के इतका खाली होता तो २०१४ मध्ये ९२़३६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे़ जिल्ह्याची वाटचाल कॉपीतून कॉपीमुक्तीकडे सुरु आहे़ मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८.४४ टक्के होता. या वर्षी त्यात तब्बल १२ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. गुणवत्तेत बीड जिल्ह्याने विभागात आपले स्थान भक्कम केले आहे़ विभागात अव्वल स्थान पटकाविणार्‍या बीडने यावर्षीही आपले स्थान कायम राखण्यात यश मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील मुलं हुशारच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख कायम राखण्याचे आव्हान यापुढे पेलवावे लागणार आहे़ प्राध्यापकांना श्रेय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बारा टक्के निकाल अधिक लागला आहे़ बीडमध्ये वर्षभर अध्ययन व अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे केले जाते़ सराव परीक्षा होतात, प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे वैयक्तिक लक्ष देतात़ त्यामुळेच बीड जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे. मुली एकाग्रतेने अभ्यास करतात त्यामुळे त्या मुलांना मागे टाकू शकल्या. या यशाचे श्रेय प्राध्यापकांबरोबरच पालकांनाही जाते, अशी प्रतिक्रिया बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वर्षनिकाल २०१०७१़७४ २०११७८़७७ २०१२७६़२१ २०१३८८़४४ २०१४९२़३६ जिल्ह्यात बीड तालुक्याची सरशी बीड जिल्ह्याच्या एकूण निकालात बीड तालुक्याने दणदणीत यश संपदान करुन छाप सोडली़ बीड तालुक्याने ९४़२० टक्के निकाल लागला आहे़ त्यापाठोपाठ गेवराई व वडवणी तालुक्याचा ९४़१८ टक्के इतका निकाल लागला़ ९३़७४ टक्के मिळवून केज तालुक्याने तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. धारूर सर्वात तळाशी आहे. धारूरचा निकाल फक्त ८६.७६ टक्के इतका आहे.